औंध(वार्ताहर):- शेनवडी ता.खटाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते व राजस्थान जिल्ह्यातील शिरोही येथील प्रसिद्ध सोना चांदी व्यावसायिक पै.श्रीमंतराव गलंडे यांनी कोरोनाच्या भीषण संकटात शेनवडी, औंध,पिंपरी येथील गरजू 150कुटुंबांना वाढदिवसाचा खर्च टाळून जीवनावश्यक साहित्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे. यापुढील काळातही आपण आवश्यक ती मदत करत राहणार असल्याचे पै.श्रीमंतराव गलंडे यांनी सांगितले. त्यांनी दाखविलेल्या सामाजिक दातूत्वाबद्ल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. औंध येथे उपसरपंच दिपक नलवडे,पै.श्रीमंतराव गलंडे, पोलीस नाईक बी.एन.जाधव,प्रशांत पाटील, शैलेश मिठारी, आण्णा गोसावी,पी.एस.सर्वगोड, शशिकांत कदम,निळूभाऊ कांबळे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. याकामी त्यांना सागर जाधव,दादासो सातपुते, अभिजित तरंगे, अभिजित पडळकर, संदिप सातपुते, विकास सातपुते, सागर भोसले, चंद्रकांत महाडिक, बबन घोडके, कूष्णदेव भोसले आदींचे सहकार्य मिळत आहे
शेनवडी ता.खटाव येथील रहिवासी व व्यावसायिक पै.श्रीमंतराव गलंडे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून 150गरजू कुटुंबांना केले जीवनावश्यक साहित्य वाटप ; समाजासमोर ठेवला एक वेगळा आदर्श
RELATED ARTICLES