परळी :- जगभरात व भारतात करोना साथीच्या रोगाची लागण झाली आहे. मुंबई व पुण्यातील आजची परिस्थिती सर्वांसमोर आहें. चुकीच्या मार्गाने प्रवास पास मिळवून अनेक जण आपापल्या परीने गावाला येत आहेत.चुकीची माहिती देवून प्रवास पास मिळवणार्या विरुद्ध भारतिय दंड संहिता, फैजदारी दंड प्रक्रिया अन्वये सक्षम अधिकार्याने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन, आणि भारताचा महामारी कायद्या अन्वये फाैजदारी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई, पुण्यातील लोकांनी गावाला येतांना व आल्यानंतर योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
*जर परळी भागात याच वेगाने करोना चा फैलाव झाला तर शेतकरी खरीप हंगामात जीव वाचवण्या करीता हॅास्पीटल मध्ये दाखल होऊन औषध उपचार करतील की शेती करतील ????*
हा एक हंगाम वाया गेला तर पुढील हंगाम 15 महिन्या नंतर येईल. घरच्या अन्न धान्याचा तुटवडा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे परळी भागातील मुंबई पुणे येथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना व नातेवाइकांना विनंती आहे की गावाच्या प्रगतीत नेहमीच तुम्ही साथ असते परंतु शक्य असेल तर गावाकडे येण्याचे टाळावे व आपले गाव वाचवावे.
गाव आपले आहे आपण एकजुटीने त्याचा सांभाळ केला पाहिजे.
ग्रामीण भाग करोनमुक्त ठेवा ; ग्रामीण भाग वाचवा
RELATED ARTICLES