समाज कंटकाकडून पर्यावरणावर घाला
शेकडो वर्षाची ब्रिटीश कालीन झाडांच्या बुंध्याना लावल्या आगी
वाई : वाई – सुरूर रस्त्यावर मानसी हॉटेल जवळील जानकी पेट्रोल पंपाजवळ परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असणार्या शेकडो वर्षाच्या ब्रिटीश कालीन झाडांना बुंध्यात केमिकलच्या सहाय्याने आग लावण्याचे दुर्दैवी प्रकार समाज कंटकाकडून घडत आहेत. उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढल्याने ओल्या झाडानाही त्वरित आग लागत आहे. ही अतिशय दुर्दैवाची बाब असून पर्यावरण प्रेमीमधून संतापाची लाट उसळली आहे.
सुरूर रस्त्यावरजानकी पेट्रोल पंपाजवळसात ते आठ मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्याला मोठी आग लावण्यात आली होती. वाईतील पर्यावरण प्रेमींनी झाडाच्या बुंध्यात लागलेली आग विझवून झाडाला जीवदान दिले आहे. त्यावेळी संबंधित विभागाने अशा गैरकृत्य करणार्या समाज कंटाकाना शोधून कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली. ही आग नक्की कोणी आणि कशासाठी लावली असा संशय पर्यावरण प्रेमिकडून व्यक्त करण्यात येत आहे. सद्या झाडे तोडण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्यानेजंगल संपत्ती नष्ट होत आहे. दिवसेंदिवस सूर्य आग ओकून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तरीही संबंधित विभागाकडून यावर कोणताही उपाय करण्यात आला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत असून त्याचा परिणाम पर्जन्यमान व जीवसृष्टीवरहोत आहे. झाडे नष्ट होण्याचे प्रमाण वाढल्याने निसर्ग कोपला असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.निसर्ग संपत्ती नाहीशी झाल्याने पर्यावरणाचा र्हास होवून जमिनीची धूप वाढत असून, मानवाचे निसर्गावर होणारे आक्रमण वाढत चालल्याने दुष्काळासारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी सध्या संपूर्ण महाराष्ट्रालाअनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हे त्याचेचदूषपरिणाम भोगावे लागत आहेत. समाजाला आज पर्यावरण संरक्षणाचे प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वेळीच समाज प्रबोधन झाले नाही तर हे दुर्दैवी प्रकार दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत.वन विभाग व ज्याच्या हद्दीत हि झाडे आहेत तो बांधकाम विभाग यांनी एकत्रित पणे या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. वन विभागाचे झाडे लावा, झाडे जगवा हे ब्रीद वाक्य सत्यात उतरविण्याची आवशकतानिर्माण झाली आहे. व त्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. समाजातील काही घटकांनी, पर्यावरण प्रेमींनी या विभागाला सहकार्य केल्यास हे प्रकार त्वरित थांबू शकतात.ओल्या झाडाला आग लावून नष्ट करण्याचा हा प्रकार दुर्दैवी असून तो थांबण्यासाठी सर्वांनी एकत्रित पणे पुढे येण्याची गरज आहे.तसेच बांधकाम विभागाने रस्ते रुंदीकरणात झाडे हटविण्यापेक्षा ती स्थलांतरित करून नव्याने लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून समाजाला एक दिशा मिळून अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी मदत मिळेल.