सातारा : क्रांतीकारी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या क्रांतीकारकांना सातारा शहरातील गेंडामाळ परिसरात असणार्या वडाच्या झाडावर टांगून फाशी देण्यात आली होती.
फाशी देण्यात आलेल्या जागेवर असलेले स्मारक रुपातील हे वडाचे झाड विघ्न संतोषी लोकांनी मोठ्या प्रमाणात छाटून टाकले आहे. त्यामुळे सातारकरांमध्ये मोठा संताप व चिड निर्माण झाली आहे.
या स्मारका बाबत अधिक माहिती अशी की, 1857 च्या या संग्रामातील हे फाशी गेलेले क्रांतीकारक पुढील पिढीसाठी कायमस्वरुपी आठवणीत रहावे या उदात्त हेतूने या वडाच्या झाडाच्या मृती इतिहास प्रेमींनी या परिसरात स्मारक उभारुन जागवल्या तत्कालीन वटवृक्ष 1963 मध्ये जीर्ण होवून जमिनदोस्त झाला. याच जागेवर नंतर अनेक वडाची झाडे लावली गेली. परिसरातील मोकाट जनावरांच्या वावरामुळे येथील वडाचे झाड अनेक वेळा खाऊन टाकल्याने दिसानेसे होत होते. मात्र 15 ऑगस्ट 1987 रोजी या ठिकाणी तत्कालीन न्यायाधिश श्री. गंभीर यांचे मालकीच्या जागेतील वडाचे रोप आणून या स्मारकावर लावण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नगराध्यक्ष स्व. बन्याबापू गोडबोले व मुकुंदराव दाबके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. व त्यानंतर हा वटवृक्ष चांगला जोपासला गेला. काही काळानंतर सातारा नगरपालिकेने या ठिकानी स्मृतीस्तंभ उभारुन परिसर विकसीत केला.
मात्र काल तोडण्यात आलेले या झाडाच्या फांद्या व करण्यात आलेली कत्तल यामुळे या वटवृक्षाचा केवळ बुंधाच शिल्लक राहिला आहे. परिसरातील नागरिकांनी या कृत्याबद्दल चीड व संताप व्यक्त करुन इतिहासच नामशेष करणार्या अशा विघ्न संतोषी लोकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
ऐतिहासिक फाशीच्या वडाच्या स्मृती जमीनदोस्त
RELATED ARTICLES