Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीहिंदु समाजाने जागृृत होण्याची गरज: अनुप केणी

हिंदु समाजाने जागृृत होण्याची गरज: अनुप केणी

साताराः हिंदुस्थानात हिंदु हा सुरक्षित नाही हिंदुच्या बाबत कोणीच बोलत नाही. हिंदुत्ववादी म्हणणार्‍यांची सत्ता येवुनही राम मंदिराचे निर्माण होऊ शकत नाही. विविध संघटना व न्यायालयाच्या कारवाईत राम मंदिर उभे करण्याचे दिनांक पुढे – पुढे सरकत आहे. अशी घणघाती टिका महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुप केणी यांनी केली.
श्री. केणी पुढे म्हणाले की हिंदु समाज निद्रिस्त आहे त्याला त्याच्या हक्काची जाणीव नाही. म्हणुन राज्यकर्ते त्यांचा वापर करीत आहेत. हिंदु समाजाने आता जागृत होण्याची वेळ आलेली आहे. अखिल भारत हिंदु महासभेचे महाराष्ट्र राज्यस्तरीय द्विवार्षीक अधिवेशन संपन्न झाले. सातारा येथील शिवम या सभागृहात दोन दिवसांच्या अधिवेशनात महाराष्ट्रातुन प्रतिनिधी उपस्थित होते या अधिवेशनात महाराष्ट्र हिंदु महासभेचे अध्यक्षपदी अनुप केणी यांची ङ्गेरनिवड झाली.
विलासराव खानविलकर यांची प्रमुख कार्यवाह पदी, उपाध्यक्षपदी गोविंद गांधी व मनोहर घोरपडे यांची निवड झाली. प्रदेश संघटकपदी अरुण माळी व महिला अध्यक्ष म्हणुन दिपाली खाडे यंाची निवड झाली. सभेचे अध्यक्षपदी दिनेशराव भोगले, केंद्रीय संघटनमंत्री हे होते.
स्वा. सावरकरांच्या प्रतिमेस प्रथम उपस्थितांनी पुष्पहार अर्पण केला व हिंदुध्वज गीत म्हणल्यानंतर अधिवेशनास प्रारंभ झाला. अधिवेशनात माननीय संग्रामसिंह गायकवाड हे उपस्थित होते. प्रास्ताविक अधिवक्ता गोविंद गांधी यांनी केले. त्यांनी हिंदु महासभेचा इतिहास सांगितला.
संग्रामसिंह गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले कि हिंदु महासभा चे काम न विसरण्यासारखे आहे, आज हिंदु संघटनाची गरज आहे. येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदु महासभेचा उमेदवार म्हणुन उभा राहणार आहे. हिंदु महासभेला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. यावेळी अनेक मान्यवरंानी आपले विचार व्यक्त केले.
अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात विविध हिंदुत्त्ववादी संघटना व धार्मिक संस्थांना यावेळी निमंत्रीत करण्यात आले. हिंदुत्त्ववादी आघाडीचे नेते मिलींदभाऊ एकबोटे यांनी हिंदुत्त्वासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. स्वा. सावरकरांच्या विचारांचा प्रसार होणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की,
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसाला बहुसंख्येने धर्मप्रेमींनी उपस्थित रहावे. यावेळी मल्हारी देवस्थान जेजुरीचे अध्यक्ष राजकुमार लोढा, जोतिबा देवस्थानचे विश्‍वस्थ प्रविण भोसले, डर्मॉट्रीमोनी चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर श्री. राकेश व एकता नहार, सनातक प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापूरे, विश्‍वहिंदु परिषदेचे पदाधिकारी जितेंद्र वाडकर, श्री. वि.म. काळे महाराज, तपस्वी श्री जगन्नाथ विसापुरे महाराज, श्री. नितीन नारकर इ.मान्यवरांचा अध्यक्ष अनुप केणी व मिलींदभाऊ एकबोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दोन दिवस चाललेल्या अधिवेशनात सातारा जिल्हाध्यक्ष सातारा अधिवक्ता दत्ता सणस व उपाध्यक्ष धनराज जगताप यांनी खुप परिश्रम घेतले. त्यांना अ‍ॅड. सतीश खानविलकर, मुलचंद ओसवाल, मुकुंदराव उरणे, रमेश ओसवाल, धनराज देसाई, उमेश गांधी, शंतनु पवार, भवंरलाल जैन, विजय बर्गे, मंगलसिंह राजपुरोहित, हर्षल ओसवाल, संदिप सपकाळ, हेंत गांधी हरिष शेलार, बंटीराज जगताप, ललित ओसवाल यांनी सहकार्य केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular