पुसेगावः गेल्या दशकभर शिवसेना रस्त्यावर उतरून जिहे कठापूरसाठी संघर्ष करत असून आता ही महत्त्वाची योजना पुर्ण होत असून याचे श्रेय शिवसेनेचेच आहे असे मत शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांनी व्यक्त केले
शिवसेनेच्या वतीने जीहे कटापूर येथील कामाची पाहणी करण्यात आली यावेळी कोरेगाव तालुक्याचे माजी तालुका प्रमुख बाळासाहेब फाळके,खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर कोरेगाव तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे,उपतालुकाप्रमुख संजय केंजळे,उपतालुकाप्रमुख ऋषिकेश गवळी, कोरेगाव शहर प्रमुख अक्षय बर्गे,खटाव तालुका संघटक यशवंत जाधव, अस्लम शिकलगार यांच्यासह कोरेगाव खटाव मधील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी प्रताप जाधव म्हणाले दुष्काळ पुसण्यासाठी शिवसेनाप्रमुख वंदणीय बाळासाहेब ठाकरेंनी कृष्णा खोर्याची निर्मिती केली,उद्देश माझा दुष्काळी तालुक्यातील शेतकरी सुखी झाला पाहिजे व महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी अडवणे गरजेचे होते यासाठी युती शासनाने कर्जरोखे उपलब्ध करून जिहेकटापुर योजना 80% 1999 साली पूर्ण केली . मात्र 1999 ला सत्ता गेली व योजनेला ग्रहण लागलं.आघाडी सरकारने या योजनेवर निधी उपलब्ध केला नाही मात्र परंतु योजनेवर सुप्रमाच्या नावाखाली नुसते नारळ फोडून बोगदयांचे भूमिपूजन करत राहिले,1999 पासून 20 % राहिलेलं काम आघाडी सरकारला पूर्ण करता आले नाही या वेळी शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको धरणी आदोलने मंत्र्याच्या गाड्या आडवणे सलग पाच वेळा तालुका बंद ठेऊन निषेध व्यक्त केला पुसेगाव मध्ये माझी उपमुख्मंत्री आजित दादा पवार याची गाडी आडवून त्यांना जाब विचारण्याचे धाडस प्रताप जाधव यांनी केले होते. मुंडण मोर्चा, पदयात्रा काढण्यात आल्या होत्या याच प्रशनी तुरुंग ही शिवसैनिकांनी भोगला.यावेळी या शिवसैनिकांना तत्कालीन जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, संतोष भाऊ जाधव, संजय मोहिते, दिनेश बर्गे,भानुदास कोरडे या जेष्ठ पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला. हा सर्व संघर्ष करून ही योजना पूर्णत्वास गेली नाही या योजनेच्या नावा खाली सलग पंधरा वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता भोगली या कालावधीत कोरेगाव चे लोकप्रतिनिधी यांच्याकडे पालकमंत्रीपद होते परंतु काहीही उपयोग झाला नाही कोरेगाव विधानसभा मतदार संघात विकास काम झाले नाही बेरोजगारी रस्त्यांची दुरवस्था शेतकर्यांच्या हातातून गेलेला कारखाना हे सर्व प्रश्न प्रलंबित राहिले,ना कोणती औद्योगिक वसाहत दुष्काळी पट्ट्यात उभी राहिली. दुष्काळी भागाचा कलंक पुसण्यासाठी पुन्हा शिवसेना भाजपाचेच सरकार यावे लागले,या योजनेच्या पुर्णत्वासाठी *शिवसैनिकांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांना जिहे कटापूर योजनेच कलश भेट देऊन परिस्थितीचे गांभिर्य पालकमंत्र्याना दाखवून दिले.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दुष्काळी खटाव माणचे अश्रू पुसण्यासाठी कृष्णा खोरेची स्थापना करून शेतकर्यांना पाण्याचे दाखवलेले स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे,ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रताप जाधव यांनी केलेल्या प्रयत्नांना त्यांच्या सहकार्यानीही तेवढ्याच नेटाने साथ दिली.खरे तर 80% पुर्ण झालेली जिहे कटापूर योजना आघाडी सरकारने सुप्रमाच्या नावाखाली शेतकर्यांची शुद्ध फसवणूक करून *270 कोटींची योजना 15 वर्षांत 1000 कोटींची* करून टेंडरिंग करत राहिले. केंद्रात व राज्यात आघाडीचे सरकार असूनसुद्धा यांनी सुप्रमा मिळवला नाही,यांच्या अभ्यासू नेतृत्वाने शेतकर्यांना आता पाणी येणार या आशेवर झुलवत ठेवले सुप्रमासाठी प्रयत्नच केले नाहीत, सुप्रमा मिळवण्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे,शिवसेना उपनेते नितीन बानूगडे पाटील यांनी केंद्रीय जलसमितीच्या पुढे जिहे कटापूरची वस्तुस्थिती मांडून सुप्रमा मिळविला,योगायोगाने नितीन बानूगडे पाटील यांना कृष्णा खोरेचे उपाध्यक्षपद मिळाले व कामाला खरी गती प्राप्त झाली,जिहे कटापूर योजनेवर बानूगडे पाटलांनी वैक्तिक लक्ष देऊन बाळासाहेबांनी दुष्काळी भागातील परिस्थिती बदलण्याचे बघितलेले स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचेच फलित जिहे कटापूर योजनेचे पाणी ऑगस्ट सप्टेंबर अखेर नेर तलावात पडेल.शिवसेनाप्रमुखानी दुष्काळी भागाला दिलेला शब्द पूर्ण होत असल्याने शेतकरी समाधानी असून या योजनेच्या पाणी पूजन आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करू असे मत प्रताप जाधव यांनी मांडले
जिहे कठापूरचे श्रेय हे शिवसेनेचे आहे ः प्रताप जाधव
RELATED ARTICLES