Saturday, June 21, 2025
HomeUncategorizedकेंजळ- आनंदपूर रस्त्यावर विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड

केंजळ- आनंदपूर रस्त्यावर विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड

वाई ः वाईच्या पूर्व भागात केंजळ-आनंदपूर रस्त्याचे काम सुरु असताना गरज नसूनही तीस फुट रस्त्याची रुंदी करून मोठ्या प्रमाणात वाहतूक नसताना रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली काम करणार्‍या देकेदाराने स्वहित लक्षात घेवून प्रचंड प्रमाणात अवैधरीत्या झाडांची कत्तल केली आहे, केंजळ- आनंदपूर मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असून ठेकेदाराने कोणाचीही परवानगी न घेताच बेसुमार झाडाची कत्तल केली आहे. त्यामुळे वृक्षतोडीचा प्रकार भयानक घडल्याने पर्यावरण प्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी मधून करण्यात येत आहे, मुख्य रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात कोणाचीही परवानगी न घेता सुस्थितीत असणार्‍या झाडांची निव्वळ विकासाच्या नावाखाली कत्तल करणे हे पर्यावरणासाठी घातक बाब आहे, तसेच या सर्व प्रकारापासून बांधकाम विभाग व वनविभाग पूर्णपणे अनभिज्ञ आहेत, सध्या वाई तालुक्यात बेसुमार वृक्ष तोडीचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. सुधारणेच्या नावाखाली जवळपास 25 वर्षे जुनी झाडे बेसुमारपणे तोडण्यात आली आहेत. वास्तविक ठेकेदाराने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार या बांधकाम विभाग व वनविभाग यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. वृक्षतोडीचे कोणत्याही विभागाला काहीही देणेघेणे नाही. ग्रामीण भागात सुध्दा काही शेतकरी कसलीही परवानगी न घेता बिनदास्त पणे ब्रिटीश कालीन झाडे तोडण्याचे धाडस करीत आहेत. हे त्या विभागाचे दुर्दैव म्हणावे लागेल, बांधकाम विभागाच्या हद्दीतील झाडे रस्ता रुंदी करण्याच्या निमित्ताने राजरोस पणे वनसंपदा नष्ट करीत असेल तर पर्यावरण संरक्षणासाठी प्रबोधनाची आज नितांत गरज असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. वानवा लावणे, अवैधरीत्या वृक्षतोड करणे यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक असून कायदाचा धाक अशा प्रवृत्तींना बसणे आज काळाची गरज आहे. वाई तालुक्यात अनेक ठिकाणी परिस्थिती सर्वत्र पहावयास मिळत असल्याने तहसीलदार, बांधकाम विभागासह वनविभाग वाई तालुक्यात वृक्ष संरक्षणासाठी बेसुमार वृक्ष तोड करणार्यावर काय कारवाई करणार हाही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित करण्यात आहे. बेसुमार वृक्ष तोडीमुळे सध्या दुष्काळाच्या झळा बसत असून ही परिस्थिती बदलली नाही तर महाभयंकर दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular