महाबळेश्वर: (राजेंद्र कदम, महाबळेश्वर प्रतिनिधी ) सध्याच्या घडीला कोरोना सारख्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे .आणि हा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे.या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे अनेक दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाल्याने समाज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील ज्यांचे हातावरचे पोट आहे अश्या आर्थिक दृष्ट्या निर्बल , मोलमजुरी करणाऱ्यांचे उत्पन्न बंद झाल्याने अश्या या परिस्थितीमध्ये त्यांच्या मूलभूत गरजा ही पूर्ण होऊ शकत नसल्याने त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू झाल्याने सर्व काही ठप्प झाले आहे. असे असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी तसेच मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्यांना याची मोठी झळ बसली आहे.
अश्याच ग्रामीण भागातील गोरगरीबांची होत असलेली हालअपेष्टा लक्षात घेत समाजातील अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तिंनी अन्नधान्या सह अन्य साहित्याचे वाटप केले आहे. शिवसेनेचे तालुका संघटक श्री.गणेश उतेकर, श्री. आनंद धनावडे यांनी तापोळा विभागामधील अनेक गावातील सामान्य गोरगरीब जनते पर्यंत पोहचून मदतीचा हात दिलाय.समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अश्या या गरीब कुटुंबातील लोकांना स्वखर्चातून आटा, गहू, तांदूळ, साखर, तेल , तूरडाळ, मुगडाळ, मिर्ची पावडर, मीठ इ. जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. तसेच कोरोना सारख्या आपत्ती च्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे तसेच कोरोना विषयी समाज्यात असणारे समज गैरसमज या बद्दल जनजागृती करण्याचे काम करत असतात.त्याबरोबर संकटकाळात रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेली अत्यावश्यक अशी रुग्णवाहिकेची सोय देखील करून देत आहेत.