सातारा दि: देशात पुढील पंधरा दिवसात ४० लाख कोरोना बाधित रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे आता पासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वधिक काळजी घेणारे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग ता जावळी चे नाव घेतले जात आहे . मेरुलिंग डोंगरावर गेली अनेक वर्षा पासून ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहत आहेत.स्थानिक पातळीवर शेती उद्योग व दुग्ध व्यवसाय करून उपजीविका चालवितात तर काही जण माथाडी कामगार म्हणून सातारा ,मुंबई ,नवी मुंबई या ठिकाणी उवजीविकेसाठी गाव सोडून आले आहेत. तरीही त्यांचे कुटुंबीय मेरुलिंगलाच वास्तव्य करीत आहेत. मेरुलिंग गावची सुमारे पाचशे ते सहाशे एवढी लोकसंख्या होती, पण बऱ्याच लोकांनी शहराकडे धाव घेतली आहे. ते गावी परत आले तरी मेरुलिंग गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. दोन दिवसांच्या यात्रेसाठी ग्रामस्थ गावाला आले होते परंतु सर्वांनी स्वतःला विलगीकरण करून घेतले आहे तसेच नियमांचे पालन करणारे व कोरोना तपासणी करण्यात आलेल्या ग्रामस्थांना गावकऱ्यांनी धीर दिला आहे. कोणालाही दुजाभाव केला नाही. येथील लोकांची प्रतिकार शक्ती ही नैसर्गिक चांगली आहे. डोंगर चढून व उतरून आल्याशिवाय त्यांना मेरुलिंग गावात जाता येत नाही. कष्टकरी समाज असल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाणपण चांगले आहे. अंतर ठेवून घरे बांधल्यामुळे सामाजिक अंतर राखले जात असले तरी मदती साठी धावून गेल्याने जवळीक निर्माण झाली आहे. अठरा वर्षपूर्वी मेरुलिंग येथील पाण्याच्या टाकीतून मागासवर्गीय समाज्याला वरून पाणी वाढण्याचा प्रकार गैरसमजुतीने घडला होता. हा प्रश्न पत्रकार विजय मांडके, अजित जगताप, राहुल तपासे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वायदंडे यांनी जगासमोर आणला होता. विधिमंडळात चर्चा होऊन हा प्रश्न निकाली निघाला होता.आज गावाचा एकोपा झाला असून एकमेकांना आधार देण्याचे काम मेरुलिंग गावचे सरपंच निर्मला साबळे, उपसरपंच बाळाबाई साबळे, चंद्रकांत साखरे, तुकाराम साखरे व ग्रामसेवक सतिश गायकवाड,तलाठी आंबवले व पोलीस पाटील सुहास भोसले व ग्रामस्थ करीत आहेत.त्यांचे मान्यवरांनी कौतुक केले आहे.