पाटण:- ( शंकर मोहिते ) नीसर्गावर होणारे अतिक्रमण वाढती जंगलतोड यामुळे होणारा पर्यावरणाचा -हास पृथ्वीवर येणारे नैसर्गिक संकट हे थांबवण्यासाठी मणदुरच्या काऊद-यावर मार्तंड जानिईदेवीच्या हजारो भाविक भक्तांनी जानाईदेवीचा गुलाल आणि खंडोबा चा भंडारा च्या उधळणीत गुरुवारी सकाळी निसर्ग पुजा संपन्न झाली. यावेळी तिर्थक्षेत्र निवकणे जानाईदेवी यात्रेनिमित्त जेजुरी येथून येणाऱ्या मार्तंड – जानाईदेवी पालखी सोहळ्याचे पाटण, मणदुरे, काऊदरा परिसरातील हजारो नागरिकांनी स्वागत केले. यावेळी काऊदरा जानाईच्या नावान चांगभल, खंडोबाच्या नावान चांगभल च्या जयघोषाने दणाणून गेला.
निवकणे जानाईदेवी यात्रेनिमित्त जेजुरी येथून मार्तंड- जानाई भक्तांचा पायी पालखी सोहळा आठ दिवस प्रवास करत नऊव्या दिवशी सकाळी मणदुरे काऊद-यावर येतो. हा पालखी सोहळा बुधवारी मुक्कामी तारळे येथे होता. गुरवारी पहाटे हा पालखी सोहळा मणदुरे काऊद-यावर आला असता येथे पालखीचे पुजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी जानाईदेवीचा गुलाल आणि खंडोबाचा भंडाराच्या उधळणीत हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत निसर्ग संवर्धनासाठी निसर्ग पुजा करण्यात आली. यावेळी सह्याद्रीच्या कड्या कपारीत राहणा-या निसर्ग संवर्धन करणा-या महिलांची साडी-चोळीने ओटी भरण्यात आली. व जानाई-मार्तंड अन्नदान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तर निसर्गातील पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड रोखली जावी. आपल्या आजुबाजूचा परिसर निसर्गसौंदर्य टिकून राहण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी आवाहन करत जेजुरी येथील ग्रामस्थांनी राज्याला जागृतीचा अनोखा संदेश देणारी निसर्गपूजा हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत जानाईदेवी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केली. यावेळी जेजुरी येथील अभिषेक बावळे, वैभव रसाळ, विक्रम यादव यांनी तयार केलेल्या ड्रोनच्या सहाय्याने सोहळ्याप्रसंगी पुष्पवृष्टी झाडंच्या बियांची उधळण करण्यात आली.
पाटण तालुका पत्रकार संघाच्यावतीने काऊदऱ्यावर जेजुरीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी जेजुरीच्या नगराध्यक्षा विनाताई सोनवणे, जानाईदेवी अन्नदान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण बारबाई, निसर्गपूजा प्रवर्तक विजयकुमार हरिश्चंद्रे, विनय गुरव, पाटण तालुका पत्रकारसंघाचे उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, माजी अध्यक्ष विक्रांत कांबळे, सचिव विद्या म्हासुर्णेकर-नारकर, राजेंद्र सावंत, सौ. विजया म्हासुर्णेकर, मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, संस्थापक राजेंद्र बारबाई, जेजुरीचे नगरसेवक बाळकृष्ण बारबाई, रमेश बयास, शिवाजी कुतवळ, रत्नाकर मोरे, रवी बारबाई आदी उपस्थित होते.
जेजुरी येथून दरवर्षी पायी चालत जानाईदेवीच्या मंदिरापयर्र्ंत पालखी येत असते. जेजुरी, पुणे जिल्ह्यासह मुंबईपयर्र्ंतचे हजारो भाविक निवकणेच्या जानाईदेवीच्या यात्रेत सहभागी होतात. निसर्गपुजेनंतर पालखीचे निवकणे मंदिराकडे पायवाटेने प्रस्थान झाले. निवकणे येथे पालखीचा तीन दिवस मुक्काम असून अन्नदान सेवा ट्रस्टच्यावतीने तेथे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद व अन्नदान केले जाते. पालखी पुन्हा जेजुरीला पोहोचेपर्यंतच्या कालावधीत व तद्नंतर शिमग्याच्या सणाच्या नंतरचा येणारा मंगळवार अथवा शुक्रवार यादिवशी पंचक्रोशीतील लोकांना बोळवणीचे जेवण दिले जाते.
काउदऱ्यावर साजरी करण्यात येणारी निसर्गपूजा व अन्नदान करण्याचा उपक्रम गेल्या सत्तावीस वर्षापासून सुरू करण्यात आला असून प्रतिवर्षी त्यात सातत्य राखले जात आहे. निसर्गपूजेच्या कार्यक्रमास यादवराव देवकांत, शोभा कदम, शशिकला हादवे, इंगवलेमॅडम, शेडगेमॅडम, खाशाबा चव्हाण, विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ, महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.