Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकैलास स्मशानभूमीतील अग्नीकुंड पाण्याखाली

कैलास स्मशानभूमीतील अग्नीकुंड पाण्याखाली

 

कृष्णा नदीच्या तीरावर पाणी साचल्याने अंत्यसंस्कार थांबवले
सातारा : सातारा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त झालेल्या सातारा शहर शेजारील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत कृष्णा नदीच्या तीरावर पाणी साचले आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार काही काळासाठी थांबविण्यात आले आहेत.
कृष्णा नदीच्या काठावर सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेली चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी विक्रमी पाऊस पडला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून वातावरणाच्या बदल होत आहेत. तसेच आजारी, वयोवृद्ध व्यक्ती व अपघात आणि इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढते आहे. त्या सर्वांचे अंत्यसंस्कार याठिकाणी करणे शक्य नाही.
सातारा शहर परिसरातील मृत्यू व्यक्ती वर अंत्यसंस्कार करण्यासाठी कैलास स्मशान भूमीत यापूर्वीच आठ अग्निकुंडमध्ये आज अंत्यसंस्कार झाले आहेत, त्या मुळे आज रात्री अंत्यसंस्कार होऊ शकत नाहीत, उद्या सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार होऊ शकतात. असे श्री बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी कळविले आहे.
पावसाचे प्रमाण वाढल्याने कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे.क्षेत्र माहुली याठिकाणी अंत्यसंस्कार व धार्मिक विधी करणे धोकादायक ठरू शकते याची जाणीव ठेवून नागरिकांनी सहकार्य करावे असे सांगण्यात येत आहे.ज्यांना पोहता येत नाही त्यांनी हात पाय धुण्यासाठी नळाचा वापर करावा. तसेच सर्व सूचनांचे पालन करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular