उल्लंघन करणार्यावर कडक कारवाई
-निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा
सातारा : लोकसभा निवडणूक शांततेत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे. आचार संहितेचा भंग केल्यास गंभीर कारवाई केली जाईल, असे निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने आज विविध राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. झा बोलत होते. या बैठकीला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल, निवडणूक खर्च निरीक्षक अल्पेश परमार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रचार सभा, रॅली काढण्यासाठी राजकीय पक्षांनी पूर्वपरवानगी घ्यावी, अशा सूचना श्री. झा यांनी दिल्या. निवडणुकीच्या अनुषंगाने लागणार्या वस्तुंचे दर पक्षांना दिले आहेत. त्या प्रमाणे खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी किंवा त्याच्या प्रतिनिधींना नोंदविलेला खर्च पाहण्यासाठी 12, 16 व 20 एप्रिल या तीन दिवस उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या दिवशी येऊन खर्च पडताळणी करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
45- सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हिएम, व्हिव्हिपॅट मशीन निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी अंतीम प्रक्रीया करुन सज्ज करण्यात येणार आहेत. यावेळी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीमध्ये पोलिंग एजंट व काऊंटींग एजंट यांचे कर्तव्य विषयी माहिती सांगण्यात आली. या बैठकीनंतर राजकीय पक्षांसोबत स्टॅन्डींग कमिटीची बैठकही संपन्न झाली.
लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आदर्श आचार संहितेचे पालन करा;
RELATED ARTICLES