कराड ःश्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार नाम संस्थेस प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती श्री कालिका कुटूंब प्रमुख मुनीर बागवान – सावकार व पतसंस्थेचे चेअरमन प्रा. अशोक चव्हाण यांनी दिली.
नाम फाउंडेशन ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांनी सुरू केलेली धर्मादाय संस्था आहे. हया संस्थेची स्थापना सप्टेंबर 2015 मध्ये झाली. हि संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदत करते. स्व. यशवंतराव चव्हाण यांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र घडविण्यासाठी त्यांची विचारधारा जनसामान्यात रूजावी यासाठी नाम संस्थेने विशेष प्रयत्न केले आहेत अशी आमची धारणा आहे.
ऑगस्ट – सप्टेंबर 2015 च्या दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयाना अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरूवातीला नांदेड, परभणी, हिंगोंली, जिल्हयातील 2015 यावर्षी आत्महत्या किट असे मदतीचे स्वरूप होते. परंतू फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न राहता, शेतकर्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठी सुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली. या कल्पनेचे रूपांतर नाम फाउंडेशन या संस्थेमध्ये झाली. सप्टेंबर 2015 मध्ये पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी झाली.कालिकादेवी पतसंस्थेने आतापर्यंत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षीत, आणि ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांना यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने यापूर्वी सन्मानित केले आहे. नाम संस्थेस हा पुरस्कार 25 नोव्हेंबर 2016 रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
नाम संस्थेस यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES