(छाया : अभिषेक जोशी, कुरोली)
वडूज: सामाजिक, राजकीय व इतर सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणार्या कार्यकत्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींच्या आदर्श विचारसरणीने कार्यरत राहिले पाहिजे असे मत सांगली येथील संभाजीराव भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.
वरुड (ता. खटाव) येथील वाघजाई देवीच्या प्रतिष्ठापणेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इंदोर येथील कालिचरण महाराज, वेदाचार्य मधुर जोशी, श्री त्र्यंबकेश्वर महाराज व अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
तुकाराम महाराजांच्या अभंगावर मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी बोलत होते. ते म्हणाले, आजकाल फक्त भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व शाहु, फुले, आंबेडकरांची आठवण होते. मात्र प्रत्यक्षात अनेकजण या विचारांच्या विसंगत कार्यरत असतात. छत्रपतींनी जाती-पातीत न अडकता गुणवत्तेला प्राधान्य दिले होते. स्वराज्यामध्ये वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक मनापासून कार्यरत होते. कोणाच्या हातून काय करुन घ्यायचे याचे चांगले ज्ञान महाराजांना होते. आजकाल स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-जातीत तेढ लावण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रकारापासून सर्वसामान्य जनतेने सावध होण्याची गरज आहे. नंदकुमार जोशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अरुण इनामदार यांनी सुत्रसंचालन केले. कालिचरण महाराजांनी सांगता भाषण व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते वाघजाई मुर्ती व कलशाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तर कार्यक्रमाअगोदर सलग तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी व अन्नदान करण्यात आले होते.
पोलीसांचे प्रिकॉशन मात्र
भिडे गुरुजींच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमास कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये याकरीता औंध पोलीसांनी पुरेपूर काळजी घेतली होती. त्यासाठी दलित समाजातील प्रमुख कार्यकत्यांना कार्यक्रमादिवशी स्थानबध्द करण्यात आले होते. त्यातूनही भिडे गुरुजींचे भाषण सुरु असताना भिमा कोरेगांवचे काय ? असे म्हणत एक कार्यकर्ता मध्येच बरळला. त्यास पोलीसांनी ताब्यात घेवून प्रसाद दिल्याची चर्चा आहे.