फलटण: फलटण शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून नगरपालिकेचे प्रशासनाचे पूर्णपणे या खड्डयांकडे दुर्लक्ष झालेले आहे रथोत्सवाला काही दिवस बाकी असताना सुद्धा शहरातील खड्डे वाढतच चालल्याने नागरिक व वाहनचालक वैतागले गेले आहेत काही ठिकाणचे रस्ते अर्धवट कामामुळे धोकादायक बनलेले आहेत निकृष्ट कामे करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.
फलटण शहरात ठिकठिकाणी काही दिवसांपासून मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने येणा-जाणार्या नागरिकांना, दुचाकी वाहनचालकांना चिखल, खड्ड्यांतून वाट शोधावी लागत आहे. त्यातच काही ठिकाणी रात्रीच्या वेळी असणारे पथदिवे बंद असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
फलटण शहरात काही महिन्यापूर्वी बहुचर्चित आणि वादग्रस्त असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली ही कामे करताना अनेक रस्ते उखडले गेले कामे पूर्ण होतात हे रस्ते संबंधित ठेकेदाराने दुरुस्त करणे गरजेचे होते मात्र हे न करता रस्ते तसेच ठेवल्याने पावसाळ्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते चिखल होऊ नये म्हणून काही भागात नगरपालिकेने मुरूम टाकला यामुळे आणखीनच चिखल वाढत गेला अनेक वाहनचालकांचे अपघात झाले नागरिकांना चिखलातून मार्ग काढणे ही जिकिरीचे झाले होते काही ठिकाणी नगरपालिकेने रस्त्याचे कामे सुरू केली मात्र अनेक गल्लीबोळातील रस्ते तशीच ठेवली आहेत रस्त्यांची दुरवस्था मुळे अनेक वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे शहरातील मुख्य रस्त्यांची ही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे क्रांतिसिंह नाना पाटील चौक, एसटी स्टँडच्या समोर रस्ता ,पाचबत्ती चौक, जुना सिमेंट रोड,रिंग रोड तसेच रथ मार्गावरील काही रस्ते खड्ड्यात गेले आहेत शहरात खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असून त्यातच डेंग्यूची मोठी साथ पसरली आहे अनेक लोक आजारी पडत असताना नगरपालिकेतील प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक खड्ड्याबाबत काही बोलण्यास तयार नाहीत यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे
फलटनचा प्रसिद्ध श्रीराम रथोत्सव येत्या काही दिवसात साजरा होत असून हा रथ ज्या ज्या मार्गावरून जातो त्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजेनासे झाले आहे रथाचा पार्श्वभूमीवर नगरपालिकेने रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे मात्र सध्यातरी ते होताना दिसत नाही संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा च्या दरम्यान शहरातील खड्डे बुजवण्याचे काम नगरपालिकेने केले होते मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बुजवलेले खड्डे पुन्हा दिसू लागले आहेत खड्डे बुजवण्याचे किंवा रस्ता करण्याचे कामे देताना ही कामे 100% परिपूर्ण होणे गरजेचे आहे मात्र यातील कामात भ्रष्टाचार होत असल्याने पुन्हा पुन्हा खड्डे पडू लागले आहेत अधिकारी वर्गाने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे
फलटण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य ; निकृष्ट कामे करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी
RELATED ARTICLES

