सातारा: एकदा महाराष्टासह देशातील जनता बेसावध राहिली आणि देशात भाजपची सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा या जोड गोळीने लोकशाही मोडीत काढली आहे. पुलवामा घडवून देशाच्या राजकीय क्षितिजावर पुन्हा एकदा मोदी आणि शहा ही जोड गोळी सत्तेत येण्याचा प्रयत्न करीत आहे. ही जोड गोळी पुन्हा एकदा सत्तेत आलीतर देशात हुकमशाही आल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून महाराष्टातील व देशातील जनतेला माझी विनंती आहे की, आता पुन्हा बेसावध रहाऊ पुन्हा नका असे आवाहन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातार्यातील गांधी मैदानावर झालेल्या विराट सभेत केले.
सातार्यातील गांधी मैदानावरील विराट जनसमुदायाला संबोधित करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर ठाकरी भाषेत चौफेर हल्लाबोल चढवला. मी लोकसभा निवडणूक लढवत नाही. किंवा माझा कोणताही उमेदवार या निवडणुकीच्या रिगणात नाही. पण निवडणुकीत नसलो तरी मी, देशातील भ्रष्टाचारावर व घडामोडीवर बोलू नये असा होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोड गोळीने पाच वर्षात देशात धुमाकूळ घालून रंग दाखवले आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी या मोदींनी आधीच्या सरकारला प्रश्न विचारले. त्याच प्रश्नांची उत्तरे आता उत्तरे देत नाहीत. एक प्रश्नांवर चकार शब्दही काढत नाहीत. झटका आल्यागत कोणालाही न विचारता नोटा बंदी केली. नोटा बंदी करताना मंत्री मंडळाला विश्वासात घेतले नाही. नोटा बंदीमुळे देशातील साडेचार ते पाच हजार कोटी लोकांचे रोजगार गेले. अनेक कंपन्या बंद पडल्या. नोटाबदिनंतर भाजपचे दिल्लीत सेव्हस्टार ऑफिस उभे राहिले. भाजपचे नेते निवडणुकात अमाप पैसे वाटत आहेत. पण पोलीस यंत्रणाही काही करू शकत नाही. कारण सर्व यंत्रणा ताब्यात घेतली आहे. देशातील गोधळ सुरू आहे, तो जनतेला कळू नये म्हणून सर्व यंत्रणा ताब्यात ठेवल्या आहेत.
पुलवामा हल्ला निवडणूकिसाठी घडवून आणला का? मी दोन वर्षांपूर्वी म्हटले होते, हे मोदी युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करणार आणि त्याचा फायदा उठवणार. आणि तसच घडलं आहे. आपले जवान मायनस डिग्रीत रहात असतात. जवानांच्या मरणाचा राजकीय फायदा घेत होते. हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना प्रश्न विचारत होते. सर्व सेना आपल्या हातात आहे, मग अतिरेकी येतात कसे. मग मोदींना माझा सवाल आहे. तुमच्या हातात सत्ता असताना आरडीएक्स कसे आले, उत्तर द्या. आता प्रश्न तेच आहेत, मोदी का? उत्तरे देत नाहीत. या पाच वर्षात जास्त सैनिक मारले गेले. मोदी शपथ विधीला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलवतात. हेच मोदी पाकिस्तान मध्ये जाऊन शरीफ यांना केक भरवतात, त्यांच्या बरोबर जेवण करतात. तुम्ही एक मारला तर आम्ही चार मारू असे सांगणारे मोदी आपल्या जवानाला माफी मागायला लावतात, का? तर चेक पोस्टवर एक अतिरेकी मारला म्हणून. असा पंतप्रधान वागणार असेल तर आपल्या जवानांनी कसे देशाचे संरक्षण करायचे. आमच्या जवानांवर दगडफेक होते. पण आपले जवान प्रतिकार करू शकत नाहीत, का? तर आपल्यावर गुन्हे दाखल होतील. आपल्या मागे देश उभा रहाणार नाही अशी भावना निर्माण झाली आहे. जवान देशाचे संरक्षण करतात आणि हिकडे जवानांना मुले होतात. असे वक्तव्य भाजपचा आमदार परिचारक करतो. तोच आमदार मोदींच्या व्यसपीठावर आहे, हे आजचे ताजे उदाहरण आहे. या सर्व प्रकारावरून पुलवामा घटना घडवून आणली, हे स्पष्ट होते आहे. घटनेनंतर सर्जिकल ऑपरेशन केले. त्यात 400 अतिरेकी मारले, हे अमित शहा यांनी सांगितले, त्यांना पाहिले कसे कळले. आपला पायलट पाकिस्तान सैनिकाच्या हातात सापडतो. चार दिवसांनी त्याला सोडले जातात. अरे 400 अतिरेकी मारले गेले असते तर आपला पायलट जीवंत राहिला असता का? याचा विचार देशातील जनतेने करावा. हे सर्व मोदींनी निवडणूकीच्या तोंडावर हे घडवून आणतो. 40 जवान मारले गेल्यावर 14 फेब्रुवारीला कोरियात फोटो सेशन करतो, काय म्हणायचे या माणसाला.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात 14 हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. खोट्या जाहिरातीवर साडे चार हजार कोटी रुपये खर्च केले. शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत. पुन्हा मोदी, शहा ही दोन माणसे देश संपवणार आहेत. यांची वाटचाल हिटलर शाहीच्या दिशेने सुरू आहे. मतदारानो आता पुन्हा ती चूक करू नका. एकदा महाराष्ट्र बेसावध राहिला आहे, देशातील जनतेला माझी विनंती आहे, असे राज ठाकरे यांनी शेवटी सांगितले.
पुलवामा घडवून देशाच्या राजकीय क्षितिजावर येण्याचा मोदी, शहा प्रयत्न : राज ठाकरे
RELATED ARTICLES