वडूज : माढा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संजयमामा शिंदे व भाजपा-शिवसेना महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होत आहे. शरद पवारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केल्याने या मतदारसंघाला देशभरात अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे विविध प्रसारमाध्यमांबरोबर सोशल मिडीयाचेही मोठे लक्ष आहे.या लढतीच्या निमित्ताने फक्त सोशल मिडीयावर जोरदार वॉर सुरु आहे. मात्र गांव पातळीवर अद्याप म्हणावी तशी प्रचारास गती आली नसल्याचे चित्र आहे.
या मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा या मतदारसंघाचे माजी केंद्रीय मंत्री व चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या पवार साहेबांनी केेले आहे. पहिल्या निवडणूकीत त्यांना भाजपाचे सुभाषबापू देशमुख व रा.स.प. चे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर या दोघांनी आपल्या परीने चांगले आव्हान दिले होते. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या मताची बक्षीशी म्हणून आत्ता ते दोघेही राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद भूषवत आहेत. मागील निवडणूकीत पवार साहेबांनी राज्यसभेवर जाणे पसंत केल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने विजयसिंह मोहिते-पाटील यांना निवडणूकीच्या रिंगनात उतरविण्यात आले होते. विजयदादांनीही उपमुख्यमंत्रीपद भूषविल्याने त्यांच्या नावाला एक वेगळे वलय होते. त्यांच्या विरोधात तत्कालीन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुसर्या क्रमांकाचे नेते सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी केली. प्रस्थापितांविरोधात असणारी नाराजी व मोदी लाटेचा जोरदार फायदा घेत सदाभाऊंनी मोहिते-पाटलांना चांगलीच कडवी लढत दिली. ऐनवेळी माळशिरस तालुक्याने हात दिला नसता तर मोहिते-पाटलांना पंढरपूर विधानसभेची पुनरावृत्ती अनुभवावी लागली असती. या निवडणूकीत पडलेल्या मतांच्या प्रभावाने गावोगावी चळवळीत हिंडणारे फाटके सदाभाऊ आता दिमाखात मंत्र्याच्या गाडीतून फिरत राज्यमंत्रीपद भूषवत आहेत.
आता सर्वसाधारण प्रोफाईलचे उमेदवार
यावेळच्या निवडणूकीत पंतप्रधान पदाची दुर्देम्मी इच्छाशक्ती बाळगणार्या पवार साहेबांनी पहिल्यांदा स्वत: बाशिंग बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलवामा हल्यानंतर नाट्यमयरित्या त्यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीनंतर उमेदवारी कोणास द्यावी हा पेच निर्माण झाला. मोहिते-पाटील घराण्याविरोधात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर्गत असंतोष होता. त्यातच विरोधकांच्या शिडातील हवा काढण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे बंडखोर अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना उमेदवारीचे बाशिंग बांधण्यात आले. या चालीस उत्तर म्हणून मोहिते-पाटलांसह माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या सल्याने काँग्रेसचे तत्कालीन सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपमध्ये घेण्याबरोबरलागलीच उमेदवारीही देण्यात आली. यापैकी राष्ट्रवादीचे उमेदवार श्री. संजय शिंदे यांना मागील विधानसभा निवडणूकीत करमाळा मतदारसंघातील शिवसेनेचे नारायणआबा पाटील, राष्ट्रवादीच्या रश्मीताई बागल यांच्या विरोधातील तिरंगी लढतीत मतदारांनी शिंदेंना ङ्ग मामा म बनविले होते. या निवडणूकीत शिंदे यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
यापेक्षा वेगळी परस्थिती नाईक-निंबाळकरांची नाही. फलटण विधानसभा आरक्षीत असल्याने त्यांनी पुरस्कृत केलेल्या दिगंबर आगवणे यांना दुसर्या क्रमांकाच्या मतावर समाधान मानावे लागले होते. फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागा आहेत. त्यापैकी गिरवी गटातून फक्त त्यांच्या पत्नी अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर पंचायत समितीच्या चौदा पैकी फक्त दोन जागेवर त्यांच्या गटाला समाधान मानावे लागले आहे. यामध्ये विधानसभेचे उमेदवार श्री. आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे या गिरवी गणातून तर सुरवडी गणातून लता कोळेकर विजयी झाल्या आहेत.
साखर कारखान्याची यंत्रणा हीच मोठी जमेची बाजू
दोन्ही उमेदवारांची साखर कारखान्याची यंत्रणा हीच मोठी जमेची बाजू आहे. निवडणूकीस सुरुवात झाल्यानंतर गंगानगर येथील आ. बबनदादांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व संजयमामांच्या विठ्ठल शुगरच्या कर्मचार्यांनी पहिल्यांदा गांव पातळीवरील कार्यकत्यांची शोधमोहिम घेतली. संबंधितांकडून गावातील प्रमुख कार्यकत्यांच्या नावाची यादी घेण्यात आली. परंतू नंतर हे कर्मचारी संपर्कहीन झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे कारखान्याचे कर्मचारी ज्यांना भेटले ते सर्वसामान्य मतदारांच्या दृष्टीने संशयाच्या भोवर्यात अडकले आहेत.
खटाव-माणमध्ये युतीचे पारंपारिक मते आहेत. या मतांचे संगोपन करण्यासाठी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, अनिलभाऊ देसाई, रणजितसिंह देशमुख हे तिघेजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. आ. जयकुमार गोरेंनी पाठींबा जाहीर केला आहे. त्यांचे प्रमुख विरोधक शेखरभाऊ गोरे हेही ताकतीने तळागळात जावून प्रचार करत आहेत. त्यामुळे नाईक-निंबाळकरांना वरकर्णी ङ्ग फिलगुड म ची हवा वाटत आहे. अकलूज येथे मोदींची मोठी सभा झाल्याने त्यांना स्वर्ग केवळ दोन बोटे उरल्याचा भास निर्माण झाला असेल. मात्र खरी वस्तुस्थिती निकालानंतरच बाहेर पडेल.
सोशल मिडीयावर फक्त वॉर : गाव पातळीवर अद्याप सन्नाटा
RELATED ARTICLES