महाबळेश्वर : गुरेघर येथील गावा लगत असणाऱ्या शेतातील विद्युत खांब तिरपे होऊन पडण्याच्या मार्गावर आहेत. वेळोवेळी निवेदन व पाठपुरावा करूनही त्याकडे वीज वितरण कंपनी ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच विद्युत वितरण कंपनीने या कडे लक्ष घालून सदरचे खांब सरळ उभे किंवा त्याठिकाणी नवीन खांब उभे करून होणारा संभाव्य धोका व जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. व सदरच्या विद्युत खांबाची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थान कडून करण्यात येत आहे.
गुरेघर ता . महाबळेश्वर येथील शेतात उभे असलेले विद्युत पुरवठा करणारे खांब हे तिरपे होऊन पडण्याच्या स्थितीत आहेत . ३३००० कि. वॅट विद्युत वहन क्षमता असणारी ही लाईन शेतामधून जात आहे.खांब तिरपे असल्याने एका खांबाचा दुसऱ्या खांबावर ताण पडत आहे . परिणामी एखाद दिवशी जर पाऊस वादळ-वारे उठले तर हा विद्युत खांब कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे या ठिकाणी मोठा धोका निर्माण होऊ शकतो . याठिकाणी नागरिकांची वर्दळ असते.तसेच शेतात काम करणारे शेतकरी तसेच पाळीव जनावरे यांचा या ठिकाणी वावर असतो.संभाव्य धोका लक्षात घेता महावितरणने या ठिकाणी योग्य उपाय योजना करणे आवश्यक आहे.अनेक निवेदन देवुनही त्यावर काहीच कारवाई होताना दिसून येत नाही. फक्त येऊन पाहणी करून हे कर्मचारी निघून जात आहेत. कित्येक वर्षे नागरीकांनी पाठपुरावा करून ही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे येथील नागरिकांनी या वीज वितरण कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात असून सदरचे विद्युत खांब हे सरळ उभे अथवा नवीन खांब उभे करावेत अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
गुरेघर येथील विद्युत खांब धोकादायक स्थितीत
RELATED ARTICLES