सातारा दि : किडगाव ता सातारा येथे दूषित पाण्याचे संकट उभे राहिले होते .पण, ग्रामस्थांच्या निवेदनाचा तातडीने विचार विनिमय करून तीन तासातच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक, कर्मचारी वर्ग यांनी पाण्याचे शुद्धीकरण केले. त्यामुळे ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.
याबाबत माहिती अशी की, किडगाव येथील मागासवर्गीय वस्तीला पाणी पुरवठा करणार सार्वजनिक आड (विहीर) आहे. या आडाची पूर्वी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत होती. किडगाव ग्रामपंचायत कर्मचारी निर्जंतुकीकरण करण्यासाठी आडाच्या पाण्यात टी सी एल पावडर टाकत होते. मात्र,आडाच्या पिण्याच्या पाण्यात आजूबाजूला असलेल्या झाडाचा पालापाचोळा पडत असल्याने हे पाणी दूषित झाले होते.काही लोकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीला कळविले.
किडगाव येथील कष्टकरी, शेतमजूर व सामान्य सुमारे दिडशे ते दोनशे ग्रामस्थ शुद्ध पाणी होण्याच्या प्रतीक्षेत होते.आज कण्हेर प्रा आरोग्य उप केंद्रातील अधिकारी, आरोग्य सेवक पवार आणि ग्रामसेवक नितीन पवार यांच्या समवेत सरपंच सौ अर्चना घोलप,उपसरपंच विठ्ठल इंगवले, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित ढेंबरे व ग्रामस्थांनी आडातील पाण्याचे नमुने तपासणी करून आडातील पाण्याचे सुपर क्लारीनेशन करण्याचा निर्णय घेतला.सातारा पंचायत समिती सभापती सौ सरिता इंदलकर यांनी उपयोग योजना करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले.
रात्रीच्या वेळीआडातील पाण्यात दिड पट क्लारीनेशन करण्याचे काम पाणी पुरवठा कर्मचारी दादा लोहार व ग्रामस्थांनी करून पाणी पुरवठा शुद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. दहा तासाने म्हणजे सकाळी ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा होणार असल्याने स्थानिक पातळीवर ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले आहेत. गेल्या महिन्यात लॉक डाउन सूर झाल्यानंतर अचानक पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नादुरुस्त झाली होती. परंतु, ग्रामसेवक नितीन पवार यांनी वरिष्ठ पदाधिकारी व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने यंत्रणा दुरुस्त केली. व किडगाव ग्रामस्थांना सुरळीतपणे पाणी पुरवठा केला याची यानिमित्त आठवण झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुधाकर काकडे व स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे