वाईः छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडविण्यासाठी ज्या किल्ले रायरेश्वरावर वयाच्या 16 व्या वर्षी शपथ घेवून स्वराज्य निर्माण केले, त्याच गडावर शेकडो शिवप्रेमीच्या उपस्थितीप्रमाणे 375 वा शपथदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवरायांच्या इतिहासाला उजाळा मिळाला.
श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, आम्ही भोरकर प्रतिष्ठान व शिवप्रेमी संघटनांच्या वतीने रायरेश्वरगडवर तिथीप्रमाणे हिंदवी स्वराज्य शपथ व तीन दिवसीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष इतिहास संशोधक दत्ताजी नलवडे, रायरेश्वर ग्रामस्थ संस्थेचे अध्यक्ष दत्तू जंगम, पुरोहित प्रकाश जंगम, सामाजिक कार्यकर्ते समीर घेाडेकर, बाबाजी साळेकर, राजेंद्र कोेंढाळकर, यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमांच्या पालखीतून मिरवणूक काढून मैदानी खेळाची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.
इतिहास संशोधक दत्ताजी नलवडे यांनी शपथ दिनांची माहिती दिली. रायरेश्वराच्या संर्वधनासाठी युवा पिढीने पुढाकार घेवून स्वरज्य निर्माण करण्याचे कार्य केल्यास खर्या अर्थाने हिंदवी स्वराज्यदिन साजरा होईल, असे मत शिवव्याख्याते नागेेश तनपुरे यांनी व्यक्त केली.
यावेळी सरदार कानोजी जेधे यांच वंशज युवराज जेधे , बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज केदार देशपांडे, उपसरपंच वसंत किंद्रे, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे सचिन देशमुख, संपत जंगम , किशोर जंगम,गोविंद जंगम,सुनिल जंगम, निलेश जंगम, रोहित नलावडे, अनिल साबळे, सखाराम जंगम, नामदेव जंगम, भिवलिंग जंगम, शंकर जंगम, दशरथ जंगम उपस्थित होते.
रायरेश्वरावर 375 वा शपथदिन साजरा
RELATED ARTICLES