सातारा (अजित जगताप)ः क्रांतीकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात क्रांतीचा ईतिहास सांगणारे सध्या काही महाभाग जाणीवपूर्वक शांत आहेत. तर दुसर्या बाजुला राष्ट्रवादीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासाठी सर्व पक्षीय नेते कामाला लागलेले आहेत. यामध्ये काहींनी राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलट्या दिशेने फिरविण्यास सुरूवात केली आहे व सेनेच्या धनुष्याला नव्याने आलेल्या गद्दारीचे बाण स्वपक्षातीलच उमेदवाराला घायाळ करत असल्याची चर्चा सातारा लोकसभा मतदार संघात खेड्यापाड्यात पोहचली आहे.
सतराव्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी तीव्र उन्हामुळे काही प्रमाणात थकुन गेली आहे. वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरेफ असा संत ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवले होते. त्याचा सोइस्कर विसर पडल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना वृक्षारोपणाचे महत्व पटू लागले आहे. परंतू र्दुदैवाने कोणीही आपल्या वचननामा, निर्धारनामा व जाहिरनाम्यात त्याबाबत याचा पुसटसाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सत्तेसाठी राजकीय पक्ष लढत आहे, हे सिद्ध झाले आहे. लोकसभा ही संसदेत कायदा करणार्या प्रतिनिधीला पाठवण्याची निवडणुक आहे. हे अनेकांना माहितच नाही. त्यामुळेच कुणाची कॉलर, कुणाची मिशी यावरच सभेमध्ये किस्से सांगण्याची वेळ आलेली आहे. हे सातारकरांचा र्दुदैव ठरल आहे. काळ कोणालाही माङ्ग करत नाही. त्यामुळे या निवडणुकीत नोटाला अधिक मतदान झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे श्री. छ. उदयनराजे भोसले, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, वंचित आघाडीचे सहदेव ऐवळे या प्रमुख उमेदवारांसह नऊ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे महिला सबलीकरणाचे गोडवे गाणार्या सातारा लोकसभा मतदार संघात एकाही महिला उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. शिक्षण माता सावित्री माई फुले यांचे माहेर नायगाव व सासर कटगुण हे दोन्ही सातारा जिल्ह्यात आहे. पण सर्वांनीच प्रचारासाठी महिलांचा महिला मेळावा घेऊन महिलेच्या हाती प्रचाराची दोरी दिलेली आहे. त्याला काही अपवाद पण आहेत. हे विसरून चालणार नाही. निवडणुकी पूर्वी स्वबळाची भाषा करणार्या राजकीय पक्षाना आता कार्यकर्ते प्रचारासाठी मिळत नाहीत. काहींना आतुन विरोध तर काहींना बाहेरून सुद्धा पाठींबा मिळत नसल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी वाया भाजपमधून सेनेमध्ये प्रवेश करणार्या माथाडी कामगार नेते व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे युतीचे उमेदवार आहेत. पण त्यांना काही सेना-भाजप-आरपीआय-रासप गद्दारांच्या खांद्यावर बंदुक ठेवून शिकार करण्याची वेळ आलेली आहे, ते स्वत: शिकार करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याकडे मोठा आत्मविश्वास आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अडचणीत आणणारी प्रश्नावली व त्याचे उत्तर अत्यंत चाणाक्षपणे सेनेचे उमेदवार पाटलांनी मागितलेले आहेत. या प्रश्नाची उत्तरे अपेक्षित असली तरी, ती मिळणे अशक्य आहे.
कारण या प्रश्नांची उत्तर देणे म्हणजे विद्यमान खासदारांना स्वत:ची निर्ष्कीयता सांगणे हाच त्यातून अर्थ निघू शकतो. त्यामुळे याचे उत्तर मिळणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. तर दुसर्या बाजुला राष्ट्रवादीपेक्षा श्री. छ. उदयनराजे समर्थकांनी प्रचारात कुठेही कमतरता ठेवलेली नाही. केलेल्या चुका विसरून मनोमिलनाची बुलेट ट्रेन वेगात घेऊन जाण्याचा निर्धार केला आहे. त्यांना श्री. छ. भोसले यांना सातार्यातील मिडीयाने प्रत्येक वेळेस सावरून घेतलेले आहे. ही जमेची बाजु ठरली असली तरी युद्धामध्ये शत्रुच्या चुका अनेकदा फायदेशीर ठरतात. हे सिद्ध झालेल आहे. सातार्यातील ही निवडणुक ऐतिहासिक ठरलेली आहे. ती काट्यामुळे कारण राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे व कमळाचे काटे हे दोन्ही उमेदवारांना घातक ठरू शकतात. कारण अद्याप ही दोन्ही उमेदवारांच्या बाजुला असलेल्या काहींनी प्रचारात अद्याप सहभाग घेतलेला नाही. त्यांची नाराजी दुर झालेली नाही.
ती किती ही लपविण्याचा प्रयत्न केला, तरी ती स्पष्टपणे जाणवू लागली आहे. श्री. छ. भोसले यांचे उघडपणे समर्थन करणारे भाजप सेनेमधील काही कार्यकर्ते त्यांचे हितचिंतक म्हणूनच ओळखले गेले आहेत. तसेच राष्ट्रवादीला बेरजेमध्ये न धरता आपला अजेंडा गेले पाच वर्षे पुढे रेटणारे श्री. छ. भोसले यांना राष्ट्रवादीचे सावरून धरले असले तरी, कराड, पाटण, जावली, वाई, खंडाळा, महाबळेश्वर या भागात नाराजीचे सुर उमटले आहेत. ही नाराजी कॅच करण्याचा प्रयत्न सेना भाजप कडून फारसा होत नसल्याने ही निवडणुक म्हणजे नशिबाची कसोटी ठरू लागली आहे.
सातार्यात सेनेच्या धनुष्याला गद्दारीचे बाण तर राष्ट्रवादीचे काटे उलट्या दिशेला
RELATED ARTICLES