महाबळेश्वर : ऊन असो वा पाऊस, ऋतु कोणताही असला तरी कशाचीही तमा न बाळगता संकट काळी धावून जाणारच अशी ओळख असलेली महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स. जो पर्यंत हात लावलेल्या कामाचा शेवट होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही व वळुन बघायचे नाही, हेच ह्या ट्रेकर्स चे प्रथम ध्येय. रात्र किंवा दिवस या संकल्पनेला त्यांच्या कार्यात कुठेही भाव नसतो. समोर आलेल्या संकटात प्रामाणिकपणे काम करत जायचे मग ते कितीही मोठे असो किंवा छोटे. कष्ट प्रामाणिक असायला हवे खरं-तर हेच त्यांचे धोरण असते . नमे कर्मफले स्पृहा या उक्तीप्रमाणे कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्यरत असतात . मनात जात – धर्म यांना कोठेही थारा नसतो. संकटात असणाऱ्यां प्रत्येकाचा जिव वाचविणे हीच खरी प्राथमिकता प्रत्येकाच्या नसा नसात भिनत असते.समाजसेवेत तत्पर असलेल्या या संस्थेने समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.त्यांचे कार्य समाजासाठी आदर्श ठरत आहे.
महाबळेश्वरला मोठी वनसंपदा लाभली आहे.जंगल विस्तार मोठा असल्याने अनेक प्राणी पक्षी यांचा अधिवास या जंगलात आहे .या घनदाट अरण्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. तसेच गवे, ससे, भेकर, तसेच हिंस्र पशु येथे आढळून येतात. पण ऐन उन्हाळ्यात येथील नैसर्गिक पाणवठे कमी होऊ लागतात. बरेच नैसर्गिक पाणवठे गाळात पूर्णपणे मुजुन गेल्याने पाण्याची समस्या या दिवसात निर्माण होते. हीच बाब लक्षात घेऊन सह्याद्री ट्रेकर्स ने आपल्या आवश्यक साहित्यानिशी या वनात जाऊन असे नैसर्गिक पाणवठे आहेत जे की गाळाने पुर्णपणे भरून गेले आहेत असे नैसर्गिक पाण्याचे स्रोत त्यांनी हेरून त्यामधील गाळ काढून त्यांचे पुनर्निर्माण करून पुनर्जीवीत केले आहेत.पक्षांसाठी झाडांवर पाण्याची सोय केली आहे त्यामुळे या प्राणी आणि पक्षांची पाण्याची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे. ही टीम सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून आपले कर्तव्य करीत आहेत.
देशात लॉकडाऊन आहे संचारबंदी असल्याने घराबाहेर फारसं कुणी पडत नाही त्यामुळे अत्यावश्यक सेवेबरोबर गरजुंनाजीवनावश्यक वस्तूं घरपोच पुरवत आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात रस्त्यांवर फिरणाऱ्या आजपर्यंत १५० च्यावर मोकाट जनावरांना त्यांनी खावू घातले . अशीच सामाजिक कार्ये समाजासाठी आदर्श ठरत आहेत .
या मध्ये सह्याद्री ट्रेकर्स चे अध्यक्ष श्री संजय पार्टे, कमलेश कदम, राजू साळवी, कमलेश साळुंखे, किरण चव्हाण, विठ्ठल ढेबे, श्वेता जंगम, स्नेहल साळवी, वनिता जाधव, सोनाली बांदल, स्मिता पार्टे, मयुरेश पार्टे त्यांचा सहभाग या कार्यात मोलाचा असतो.
एकीकडे संपूर्ण देश, पूर्ण राज्य कोरोना नावाच्या रोगाशी झगडत असताना महाबळेश्वर मधील सह्याद्री ट्रेकर्सने केले हे कार्य कौतुकास्पद आहे. आणि येथुन पुढेही हे कार्य असेच चालु ठेवण्याचा त्यांचा मानस आहे .
महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सची सामाजिक बांधिलकी ; जंगलातील नैसर्गिक पाणवठे केले पुनर्जीवित
RELATED ARTICLES