सातारा ः सातारा तालुक्याचा कारभार पहाणार्या सातारा पंचायत समितीच्या आवारात सेस फंडातून जल शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे.यामुळे आता कर्मचारी, पदाधिकारी व इतर अनेक कार्यकर्त्यांना तहान भागविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
सातारा जिल्हयाचे ठिकाण असलेल्या सातारा पंचायत समितीच्या आवारात नागरी सुविधाचा अभाव आहे. येणार्या ग्रामस्थांना शुद्ध जल पिण्यास मिळत नव्हते. अखेर सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, जेष्ठ सदस्य आशुतोष चव्हाण, राहुल शिंदे,संजय पाटील, सौ सरिता इंदलकर,रामदास साळुंखे व इतर सन्मानीय सद्यस्यांनी सेस फंडातून जल शुद्धीकरण यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दीड लाख रुपयांची तरतूद केली. सद्या पंचायत समितीच्या इमारत पाठीमागे असलेल्या एका बाजूला खोलीत ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याची नुकतीच उपसभापती सावंत, ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी साळुंखे, जल शुद्धीकरण यंत्रणेचे विक्रिते,रिपब्लिकन ब्ल्यू फॉर्सचे जिल्ह्याध्यक्ष मदन खंकाळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली.
ताशी अडीचशे लिटर जल शुद्धीकरण होणार आहे. या यंत्रणेला आवश्यक जल साठा करण्यासाठी नवीन टाकी बांधकाम सुरू केले जाणार आहे. याचआवारात पंचायत समिती समोर ग्रामस्थ व गरजू लोकांसाठी एक रुपयात शुद्ध जल देणारी ए टी एम यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अशा प्रकारे काम करणारी सातारा पंचायत समिती जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.
दरम्यान,आता पंचायत समितीच्या आवारात बंद असलेले गाळे महिलाबचत गटांना देण्यात येणार का?. कारण, यासाठी सातारा तालुक्यातील अनेक महिला बचत गटाच्या पदाधिकारी विचारणा करीत आहेत, पण, कोणीही त्यांची गंभीर दखल घेत नाहीत. महिलांसाठी हळदी कुंकू सभारंभ घेण्यापेक्षा त्यांना हे गाळे वाण म्हणून दिले तर खरे कर्तव्य पार पाडले याचे समाधान मिळेल अशी अपेक्षा बचत गटाच्या माध्यमातून महिला वर्ग व्यक्त करीत आहेत.
सातारा पंचायत समितीत सेस फंडातून जल शुद्धीकरण यंत्रणा
RELATED ARTICLES