Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीआगामी अधिवेशनात अपंगांचे प्रश्न सुटले नाहीत तर संबंधीत मंत्र्यावर हक्कभंगाचा गुन्हा दाखल...

आगामी अधिवेशनात अपंगांचे प्रश्न सुटले नाहीत तर संबंधीत मंत्र्यावर हक्कभंगाचा गुन्हा दाखल करणार ; माणदेश अपंग मेळाव्यात आ. जयकुमार गोरे यांचा इशारा 

म्हसवड : राज्यात 22 लाख कुटुंबा मध्ये एक व्यक्ती अपंग आहे.त्यांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत.समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी आंदोलन करावे लागते ही लाजिरवाणी गोष्ट आहे.आगामी अधिवेशना मध्ये जर अपंगांचे प्रश्न सुटले नाहीत तर आपण संबंधीत मंत्र्यावर हक्कभंगाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे  यांनी दिला.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ माणदेश अपंग मेळाव्यात अध्यक्षपदावरून आ.गोरे बोलत होते.यावेळी माणच्या तहसिलदार सुरेखाताई माने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय जगताप कार्याध्यक्ष मोहन पाटील प.स.सदस्या चंद्राबाई आटपाडकर माजी नगराध्यक्ष विजय धट सुरेश म्हेत्रे नगरसेवक अकिल काझी व मान्ययवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.गोरे म्हणाले राज्यात अपंग बांधवांच्या प्रश्ना बद्दल शासनाने गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे.केवळ अपंग या शब्दांऐवजी दिव्यांग म्हणून त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत.राज्यात 22लाख अपंग बांधव स्वःताच्या पायावर स्वहिमत्तीने उभे राहण्यासाठी धडपडत आहेत.मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.21हजार उत्पनाच्या दाखल्याची अट वाढवण्याची गरज असल्याचे सांगून आ.गोरे पुढे म्हणाले मला दुष्काळाची जाणिव जशी  आहे.तशी अपंग बांधवांना त्यांच्या अपंगत्वाची असते.त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांना सन्मानाने जगण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी असणार्या महामंडळावर अपंग अधाकार्‍याची नेमणूक करणे गरजेचे आहे.त्यांना दाखले मिळावेत म्हणून प्रत्येक 3 महिन्यातून तालुका निहाय कॅप्म आयोजित करण्यासाठी ठोस भुमिका घेणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी तहसिलदार सुरेखाताई माने म्हणाल्या मला अपंग असल्याची जाणिव 3री इयत्तेत असताना धावण्याची शर्यंत होती त्यावेळी व इयत्ता10वी मध्ये राज्यात अपंगा मध्ये पहिली आली त्यावेळी झाली.मला माझ्या कुटुंबियांनी नेहमीच प्रोत्साहन दिले असे सांगून पुढे म्हणाल्या शासन अपंगासाठी 3टक्के निधी देत आहे त्यांचा उपयोग लघूउद्योग,कुटीर उद्योगा साठी करून स्वःताच्या पायावर उभे राहून हिम्मतीने जिवनात पुढे जाऊन आदर्श निर्माण करावा.21हजाराच्या दाखल्याची अडचण येऊ देणार नाही.त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन माने यांनी यावेळी दिले.
यावेळी संजय जगताप अमिन आगा यांनी मनोगत व्यक्त केले.तर यावेळी पत्रकाराचा सत्कार आ.गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सागर सावंत नितिन काटे विक्रम शेंडगे अशोक सावंत विकास खिलारी सुनिल माने आदिनी परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular