(छाया : उमेश सुतार )
चाफळ : दक्षिण महाराष्ट्रातील असंख्य भाविकांबरोबरच पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या तीर्थक्षेत्र सापडला रविवारी तीन हून अधिक दशकांची परंपरा कायम ठेवत सुवासिनींनी अखंड सौभाग्याचं लेणं घेऊन हजारोंच्या संख्येने नऊवारी साड्यांचा वेशभूषेत स्नेह पूर्वक एकत्र आलेल्या व हळदी कुंकवाने लाल पिवळ्या झालेल्या सुवासिनींनी मतिळगुळ घ्या, गोडगोड बोलाफ असे मनत श्रीराम मंदिरात सीतामाईचा यात्रा मोठ्या श्रद्धापूर्वक वातावरणात पार पडली.
दक्षिण महाराष्ट्रातील असंख्य भाविकांबरोबर परदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेले तीर्थक्षेत्र चाफळ या तीर्थक्षेत्रास पर्यटन स्थळाचा मबफ वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. येथील श्रीराम मंदिरांमध्ये सन 1985 पासून महिलांच्या कल्पनेमधून सीतामाई यात्रेस प्रारंभ झाला. प्रतिवर्षाप्रमाणे महिलांचा वाढत असलेल्या संख्येत प्रत्येक वर्षी नववधूची पडणारी भर यामुळे या यात्रेस आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मकर संक्रांतीला सीतामाईचे दर्शन घेऊन तिच्याकडून अखंड सौभाग्याचा वसा घ्यायचा, यामुळे सौभाग्य अखंड टिकते. अशी श्रद्धा आजही महिलांमधून जोपासली जात असल्याचे पाहावयास मिळते. सीतामाईचा वसा घेण्यासाठी दरवर्षी मकरसंक्रातीला येईन अशी प्रार्थना करणारा वसा सलग तीन वर्ष केल्यास ते फलदायी ठरत असल्याची श्रद्धा महिलांमधून आजही रुजू असल्यामुळे प्रतिवर्षी चाफळला सीतामाईच्या दर्शनासाठी येणार्या महिलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
रविवारी सीतामाई यात्रेसाठी मंदिराच्या आवारात सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महिलांच्या गर्दीत वाढ होत गेल्याने सुवासिनींनी मिळेल त्या ठिकाणी विडे मांडून मनोभावे पूजा केली. भरजरी काठांची साडी, सुवर्णालंकार, केसात फुलांनी माळलेले सुगंधी गजरे अशा सजलेल्या वेशभूषेत अनेक महिलांनी वसा व विडा घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. महिलांनी संक्रांतीमध्ये (सुगडी) मध्ये तीळ, गाजर, गूळ, बोरे, ऊस, पावटा, गव्हाच्या लोंब्या, शेंगा, हरभरा, बिबी, घेवडा घेऊन सीतामाईचा वसा घेतला. सुवासिनींनी प्रथम सीतामाई ओवाळले व नंतर दुसर्या सुवासिनींना ववसले. यावेळी खाऊच्या पानावर खोबरे, खारीक, बदाम, सुपारी, हळदी-कुंकू ठेवून पाच सौभाग्यवतींचा हातून ओटयात घातल्या जातात. यावेळी महिला एकमेकींना तिळगुळ देऊन आलिंगन देतात. महिलांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता. सर्वत्र सगळ्यांचा खच व हळदी कुंकवाचा सडा पसरला होता. सीतामाई दर्शनासाठी ट्रस्टने बॅरेकेट्स चांगली सोय केली होती तसेच पिण्याच्या पाण्याची व महिलांना सीतामाईचे दर्शन शिस्तीने घेता यावे, यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टने विशेष व्यवस्था केली होती. मंदिर परिसरात महिलांना दर्शन रांगेने जाण्यासाठीचे मार्गदर्शक बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आल्याने सर्व महिलांना दर्शनाचा लाभ व्यवस्थित लाभ मिळत आहे. ट्रस्टच्या चोख व्यवस्थापनाबाबत महिलांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते.
यात्रेसाठी सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर सुवासिनी महिला दाखल झाल्या होत्या. सीतामाईचा वसा घेऊन संक्रांतीला दर्शन घेतल्यास सौभाग्य अखंड टिकते, असा दृढ विश्वास महिलांमध्ये आजही रूढ असल्यामुळे मतिळगुळ घ्या, गोडगोड बोलाफ, मतीळ नवे हलवा, येता जाता बोलवाफ या स्नेह पूर्वक उद्गाराने मंदिर परिसर अक्षरश दणाणून गेला होता. महिलांना दर्शनासाठी ओळीने मंदिरात सोडण्यासाठी श्री समर्थ विद्यालयाचे 100 आरएसपीचे विद्यार्थी तसेच तीन पोलीस अधिकारी 25 महिला पोलिस होमगार्ड यांनी परिश्रम घेतले. यात्रेसाठी ट्रस्टने केलेल्या योग्य नियोजनाबाबत अधिकार्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. यावेळी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, पोलिस उपनिरिक प्रदिप पाटणकर तसेच चाळीस महिला व पुरुष कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यात्रा उत्साहात व आनंदात साजरी झालि. नारळीची बाग या ठिकाणी वाहतूक नियंत्रक कक्ष उभारण्यात आला होता. वाहनांचे पार्किंगसाठी ट्रस्टने नारळीची बाग व मंदिर परिसरात पार्किंगची सोय केली होती. बंदोबस्तासाठी पंधरा विशेष महिला पोलीस तैनात केल्याने भाविक महिलांच्या संरक्षणास मदत झाली. यात्रा काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज कंपनीचे शाखा अभियंता व कर्मचारी यांनी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवला होता. यात्रेत खेळणी मिठाई नारळ तिळगुळ व इतर वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते. महिलांची वाढती गर्दी लक्षात घेता कराड पाटण वाई वडूज फलटण कोरेगाव मेढा सातारा आगारातून भाविक महिलांसाठी जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. त्यासाठी पाटण आगारप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रक आर. के. तारळेकर व अधिकार्यांनी सहकार्य केले. यात्रेमध्ये खबरदारी म्हणून आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील व डॉ. विद्या पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आलि होती. यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, मानद सल्लागार अरुण गोडबोले, विश्वस्त भूषण स्वामी, मारुतीबुवा रामदासी, गिरीश सोहनी, दिलीप पाठक, मानसी माचवे, अनिल साळुंखे, चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक बा. मा. सुतार, सरपंच अलका पाटील, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव चंदुगडे, पोलीस पाटील सागर चव्हाण यांचेसह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. श्रीराम देवस्थान ट्रस्टने महिलांना भोसा पूजनासाठी सभागृहात सोय केली होती. तसेच दर्शनासाठी शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळे सर्व भाविक महिलांना याचा लाभ झाल्याने महिलांमधून समाधानाचे वातावरण पसरले होते.