सातारा ः ( ग्रामोध्दार वृत्तसेवा) क्रेडाई सातारा शाखेच्या वतीने अजिंक्यतारा किल्ला परिसरातील मंगळाई देवी समोरील डोंगरावर वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
यावेळी क्रेडाई साताराचे सर्व पदाधिकारी, क्रेडाई वुमन्स विंगच्या पदाधिकारी तसेच क्रेडाई युथ विंगचे सदस्य, गार्डनर्स ग्रुपचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना क्रेडाई सातारा शाखेचे अध्यक्ष सुधीर शिंदे म्हणाले की, कोरोना काळात ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वृक्षांचे महत्व कोरोनाच्या काळात सगळ्यांच्या लक्षात आले आहे. ज्या ऑक्सिजनसाठी आपण आज पैसे मोजत आहोत, तोच ऑक्सिजन ही झाडे आपल्याला मोफत देत आहेत. दिवसेंदिवस होणारे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे व ती जोपासणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर के्रडाई सातारा शाखेच्या वतीने मंगळाई व चारभिंती परिसार वृक्षारोपण करण्यात आले. क्रेडाई सातारा च्या वतीने एकूण 1 हजार झाडे लावणार असून त्याचा पहिला टप्पा म्हणून 100 झाडे लावण्यात आली आहेत. तसेच लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. त्यासाठी या भागात पाण्याचा हौद निर्माण करणे, ठिबक सिंचनद्वारे या झाडांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
यावेळी क्रेडाई सातारा शाखेचे उपाध्यक्ष विवेक निकम, सेक्रेटरी मजीद कच्छी, जाईंट सेक्रेटरी सागर साळुंखे, खजिनदार मंगेश वाडेकर, जाईंट ट्रेझरर शकील सय्यद, माजी अध्यक्ष बाळासाहेब ठक्कर, कमिटी मेंबर राहुल वखारिया, बाळासाहेब शिरकांडे, दिपक पाटील, राजन पोरे, जितेंद्र भोसले, अॅड. कमलेश पिसाळ, वुमन्स विंगच्या अध्यक्षा सौ. स्वाती पाटील इ.उपस्थित होते.
गार्डनर्स ग्रुप व कन्हैयालाल राजपुरेहित यांचे विशेष मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.