म्हसवड: वरकुटे-मलवडी ता.माण येथे दहा हजार लोकांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या भव्य मैदानावर सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.फुलाबाई बापू नरळे सामाजिक, शैक्षणिक ट्रस्ट व साईसागर फौंडेशनचे संस्थापक तानाजी नरळे वकल्पनाताई तानाजी नरळे या उभायतांनी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात चौदा वधुवरांच्या जोड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी वधुवरांना संपूर्ण पोशाख व संसारासाठी 51 भांड्यांचा सट मान्यवरांच्या हस्ते सप्रेम भेट म्हणून देण्यात आला.
यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, राज्याचे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई देसाई, लोकनियुक्त सरपंच बाळकृष्ण जगताप, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, बिरजूआण्णा प्रधाने, मा.कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, मा.सभापती वसंतराव जगताप, बाबासाहेब करांडे, राजश्री नागणे, कमलताई हारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात सुरूवातीला वधू वर आणि पालक परिचय मेळावा संपन्न झाला. आणी त्यानंतर जवळपास सात हजार लोकांच्या आशिर्वादांची अक्षता डोक्यावर घेत वेगवेगळ्या गावातून सहभागी झालेली चौदा वधु-वरांची जोडपी एकाच वेळेस विवाहबंधनात गुंफली गेली.
दुष्काळी परिस्थितीमुळे अर्थीक विवंचनेत सापडलेल्या वधुपित्यांना मदतीचा हात देत,आणि आईने दिलेल्या संस्काराची शिदोरी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी वरकुटे-मलवडी या मायभुमीत सामुदायिक मोफत विवाह सोहळ्याचे नियोजन केले होते.
माण तालुक्यातील भिषण दुष्काळाच्या कालचक्रात सापडलेल्या तब्बल अठ्ठावीस वधु-वरांचे पालकत्व स्विकारुन सामुदायिक विवाह सोहळ्याचे जंगी नियोजन यशस्वीपणे पार पाडून, उपस्थित असलेल्या दहा हजार लोकांना स्वादिष्ट अन्नदान केले. आपकमाईचा काही हिस्सा समाजाच्या चांगल्या कामी खर्च करून संस्थापक तानाजीराव नरळे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अशोक नरळे, एल.डी.नरळे, संतोष कारंडे,शिवाजी नरळे, सिद्धेश्वर हिप्परकर, नितीन आटपाडकर, रवींद्र आटपाडकर, गोरख शिंदे, परमेश्वर नरळे, सुनील नरळे, विक्रम बाड, सत्यवान नरळे या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
वरकुटे-मलवडी येथे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
RELATED ARTICLES