अल्पेश लोटेकर
परळी :- पोरगं मुंबई-पुण्यात राहणार हाय..दिसायला पण एकदम झ्याक आहे.पैसा पाणी तर बक्कळ हाय…पोरीला गावचं कधी तोंड पण बघायला लागायचं नाही. अशाच पद्धतीच वर्णन हे स्थळ ठरवताना चारनाम्यानच केले जाते परंतु हेच चाकरनामे कोरोनाच्या धास्तीने मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या रस्त्याने आपल्या गावचा रस्ता धरल्याने मुंबई पुणे येथून वाढणाऱ्या ओघामुळे ग्रामीण भागाला धडकी भरत आहे.
जीवाची मुंबई अन पुणे आशा झगमगत्या दुनियेत हरवणारे मूळचे सातारकर पण कामानिमित्त मुंबई पुन्यात येथे वास्तव्यास असणारे चाकरणाने कोरोनामुळे 10 बाय 10 च्या खोलीत अडकलेले होते परंतु मागच्या आठवड्यात सरकार ने दिलेल्या आदेशाने आपल्या मायभूमीत परत जाण्यास परवानगी दिल्याने मुंबई-पुनेकरांच्या वाढत्या ओघाने ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होणार याच भीतीने ग्रामीण भागात थरकाप उडाला आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातली बहुतांश तरुण वर्ग हा मुंबई पुण्यात स्थित असला तरी सध्या जिल्ह्यात लाखो मुंबई-पुणेकर परतले असले तरी अजूनही मुंबई पुण्याहून येणाऱ्यांची गर्दी काय कमी होत नाही. तसेच जिल्ह्यात मुंबई पुण्याहून आलेले प्रवासी बहुतांश कोरोना बाधित आढळत असल्याने ग्रामीण भाग सतर्क झाला आहे.
*ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव*
सातारा तालुक्यात गेलें कित्तेक दिवस कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता परंतू चाकरणामे मायभूमीत परतू लागल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण होतेच त्यात परळी खोरे हे कोरोना महामारी पासून गेले 2 महिने अलिप्त होते परंतु मुंबई हुन आलेला व्यक्ती बाधित आढळल्याने परळी खोऱ्यात धास्ती वाढली आहे.
शाळेतले ‘ते’ दिवस
मुंबई पुण्यातून परतणारे मूळ रहिवासी याना गावी येण्यास परवानगी दिली असली तरी काही गावात सर्व चकरनाम्याना शाळेत कोर्टाईन करण्यात आल्याने आपल्या जुन्या शाळेतील आठवणी सांगत एक एक दिवस पुढे ढकल असल्याचे चित्र दिसत आहे