मायणी :- संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात संपन्न होत असलेल्या ७२ व्या स्वातंत्र्यदिन खटाव माण तालुका अँग्रो प्रोसेसिंग पडळ या साखर कारखान्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला .स्वातंत्रदिनी तिरंग्याचे ध्वजारोहण कारखान्याचे मुख्यकार्यकारी संचालक संग्रामबापू घोरपडे यांचे हस्ते झाले,यावेळी कारखान्याचे संचालक बाळासाहेब माने,भास्कर चव्हाण,विक्रम घोरपडे,महेश घार्गे ,व बालाजी जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक संग्रामबापू घोरपडे म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रात देशाने उतुंग भरारी घेतली आहे .नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध व त्यांचा योग्य वापर देशाच्या औध्यागिक प्रगती मध्ये मोलाचा ठरत आहे. खटाव माण साखर कारखानाही देशाच्या विकासात मोठा वाटा असलेल्या औद्योगिकीकरणात सक्रिय होत आहे ,हा कारखाना देशाच्या औद्योगिक विकासाला समर्पित असेल.
यावर्षी पूर्णत्वाकडे असणाऱ्या कारखान्याच्या प्रांगणात प्रथमच ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी ,पडळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार लेबर ऑफिसर प्रसाद बिडकर यांनी केले.
खटाव माण साखर कारखाना देशाच्या औद्योगिक विकासाला समर्पित – संग्रामबापू घोरपडे ; कारखाना प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात
RELATED ARTICLES