कराड: पदवी मिळविण्या बरोबर त्या पदव्यांचा उपयोग समाजहितासाठी विद्यार्थ्यांच्याकडुन व्हावा. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराप्रमाणे शिक्षणातुन विद्यार्थ्यांनी आपले मानसिक व बौध्दिक सामर्थ्य विकसित करावे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रा. कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्केे यंानी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या स.गा.म महाविद्यालयातील डॉ.एन.डी.पाटील सभागृहात सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड, डी.पी. भोसले कॉलेज, कोरेगांव व श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ या तीन महाविद्यालयांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाचा पहिल्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहूणे म्हणुन दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अॅड. रविंद्र पवार होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च विभागाचे सहसिचव प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत, प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. एस.ए.पाटील, किसनराव पाटील-घोणशीकर, जितेंद्र डुबल,अॅड. सदानंद चिंगळे व अतुल कदम उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात अॅड. रविंद्र पवार म्हणाले, पदवीप्राप्त विद्यार्थ्यानी आजच्या काळातील आव्हानंाना सक्षमपणे सामोरे गेले पाहिजे असे कर्तृत्व संपन्न विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यंानी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यंानी केला.
मान्यवरांच्या हस्ते पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा व पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स.गा.म. कॉलेज, डी.पी.भोसले कॉलेज श्रीपतराव कदम महाविद्यालयाचे परीक्षा प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते. आभार प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रा. वंदना किशोर व प्रा. डॉ. अश्विनी तातुगडे यंानी केले.
समाजहितासाठी शिक्षणाचा वापर होणे काळाची गरज: कुलगुरू डॉ.शिर्के
RELATED ARTICLES

