पाटण:- शिक्षणात व कलेत कोणाची मक्तेदारी नसते. अंगात कला पाहिजे हि कला बाहेर काढण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांच्या कला गुणांना वाव द्या. जिद्द, चिकाटी, असली की देह्य गाठता येते. मुला-मुली मधे भेदभाव न करता मुलीनांच मुलगा मानुन यशाची शिखरे गाठा. असे चित्रपट अभिनेते व हास्यसम्राट रोहित चव्हाण यांनी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत यश संपादन करणाऱ्या पाटणकर प्राथमिक विद्यालयातील गुणी विद्यार्थ्यांच्यां बक्षिस समारंभ प्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमास सातारा जि.प. माजी उपाध्यक्ष व क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर, चित्रपट दिग्दर्शक वासू पाटील, अभिनेते संजय पाटील, अजय पाटील, राजश्री समाज प्रबोधन विकास संस्थेचे सचिव शशिकांत शिंदे, डॉ. अर्चना देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विक्रमबाबा पाटणकर म्हणाले आजच्या मुलांना इंग्रजी बरोबर मराठी विषयाचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. म्हणुनच इंग्रजी व मराठी मेडीयम शाळेची स्थापन केली. सर्व सामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन हुशार विद्यार्थी घडवायचे कार्य या शाळेतून केले जाते. म्हणूनच आज शाळा स्थापनेच्या कमी कालावधीत पाटणकर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत राज्यात चमकले आहेत. पाटणचा विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी तो सक्षम असला पाहिजे. असे विक्रमबाबा पाटणकर यांनी सांगितले.
सन २०१८-१९ मध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत या विद्यालयातील राज्यात पहिल्या तीस क्रमांकाच्या यादीत २१ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये इयत्ता पहिलीतील अनुष्का संदीप माळी हीने २०० पैकी १९४ गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक, देवयानी घनश्याम मोरे १८६ गुण मिळवत राज्यात आठवा, सोहम सतिश कुंभार व तनुजा यादव खेडकर यांनी १७८ गुण मिळवत राज्यात बारावा, अर्णव बबन कांबळे १६६ गुण मिळवत राज्यात आठरावा, पृथ्वीराज उत्तम भिसे व आर्यन रामदास कोळेकर यांनी १३८ गुण मिळवत राज्यात बत्तीसावा क्रमांक मिळविला. इयत्ता दुसरीतील सई सिध्दार्थ काकडे हीने २०० पैकी १७० गुण मिळवत राज्यात सोळावा क्रमांक, आर्याली दत्तात्रय घाडगे व श्रावणी विलास शिर्के यांनी १६८ गुण मिळवत राज्यात सतरावा, अनुष्का अमित बेडके १५४ गुण राज्यात चोवीसावा, ओम गणेश भिंगारदेवे १४६ गुण राज्यात अठ्ठावीसावा, प्रगती रविंद्र कदम १४४ गुण राज्यात एकोणतीसावा, पवन तानाजी डांगे याने १४२ गुण मिळवत राज्यात तिसावा क्रमांक मिळविला.
इयत्ता तिसरीतील सृष्टी दरीगोंडा देसाई हीने २०० पैकी १९० गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक, रूद्राक्ष आनंदा घाटगे १८८ गुण राज्यात पाचवा, नेहा पुरूषोत्तम वाडेकर १८० गुण राज्यात दहावा, वैष्णवी चंद्रकांत कवडे व अतुल राजाराम नलवडे यांनी १७४ गुण राज्यात तेरावा, समृध्दी शरद साळुंखे १७२ गुण राज्यात चौदावा, अजीजा दिलावर भोज १६९ गुण राज्यात पंधरावा, राहिन समीर आतार व संकेत गणेश चव्हाण यांनी १६८ गुण मिळवत राज्यात सोळावा क्रमांक मिळविला. इयत्ता चौथीमधील उत्कर्ष उत्तम घाडगे याने १५० गुण मिळवत राज्यात पंचवीसावा, अथर्व सचिन साळुंखे १४४ गुण राज्यात अठ्ठावीसावा क्रमांक मिळविला. तर इयत्ता पाचवीतील रविराज अनिल चौधरी १४२ गुण मिळवत राज्यात तीसावा क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
यावेळी चित्रपट दिग्दर्शक वासू पाटील, अभिनेते संजय पाटील, अजय पाटील, डॉ. अर्चना देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. धामणकर एस.एस. यांनी सर्वांचे स्वागत केले. गुरव व्ही.टी. सर यांनी सूत्रसंचालन केले. भोळे जे.पी. यांनी प्रस्ताविक केले तर कार्यक्रमाच्या शेवटी चव्हाण पी.बी. यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.