औंध (प्रतिनिधी):- खटाव तालुक्याचा बुलंद आवाज, स्वाभिमानी नेतृत्व, सर्वसामान्य जनतेशी नाळ असणाऱ्या ,समाज हितैशी माजी आ.प्रभाकर घार्गे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी केली जात असून खटाव तालुक्यासह माण तालुक्यातून ही प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली जात आहे
दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्केट कमेटीचे संचालक सत्यवान कांबळे यांनी ही याबाबत मागणी केली आहे.
माजी आ.प्रभाकर घार्गे यांनी मागील वीस वर्षामध्ये कोणत्याही पदाची अपेक्षा नठेवता सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक ,उद्योग क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचे माजी आ.प्रभाकर घार्गे हे खंदे समर्थक आहेत.
खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी सोळशी धरणासह उरमोडीचे पाणी मिळावे यासाठी घार्गे साहेबांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला आहे
त्याचबरोबर शेतकरी सर्वसामान्य नागरिक ,मध्यमवर्गीय , नोकरदार तसेच समाजातील विविध घटक,छोटे मोठे उद्योजक यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध योजनांचा लाभ व्हावा यासाठी मागील दहा ते पंधरा वर्षे कसोशीने प्रयत्न केले आहेत तसेच तालुक्यातील सोसायटीच्या बळकटी करणासाठी प्रयत्न केले आहेत.
त्याचबरोबर सामाजिक ,राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना त्यांनी उद्योग क्षेत्रात ही आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
त्यांनी विधान परिषद सदस्य असताना ही सातारा सांगली विधान परिषद मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. अतिशय अभ्यासू सर्वसामान्य जनतेशी नाळ असणाऱ्या माजी आ.प्रभाकर घार्गे यांच्या सारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वास विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी खटाव तालुक्यातून केली जात आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरील नेतृत्वाने याचा विचार करावा .