महाबळेश्वर : सरकारने राज्यात अडकलेल्या लोकांना काही नियम अटीं सह आप आपल्या गावी जाण्यास परवानगी दिली आहे. पण जिल्ह्यातील वाढता कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता या जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना परिस्थिती चे गांभीर्य नसल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्याऐवजी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी मा.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर बिरामने यांनी केली आहे.यावेळी सागर भिलारे, बाळासाहेब आंब्राळे उपस्थित होते.
सुरक्षेची कोणतीही तमा न बाळगता ही लोक गावाकडे येतायत , खरच विचार केला तर ही लोक आपल्या बरोबर आपल्या कुटुंबातील तसेच गावातील राहणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत असेच म्हणावे लागेल.
गावात आल्यानंतर प्रशासनामार्फत या लोकांना पुढील १५ दिवस होमेकोरोंटाईन करुन ठेवण्यात येत आहे. परंतु अशी लोक आपल्या घरातच मर्यादित न राहता आजुबाजुच्या परिसरात सरकारी नियम धाब्यावर बसवून मनमुराद पणे फिरताना दिसत आहेत. या प्रकरणात लोकांनी आपल्या कुटुंबाची व आपल्या गावची काळजी घेणे गरजेचे असुन , प्रशासनाला देखील सहकार्य करण्याची गरज आहे. अथवा कोरोना सारख्या महामारीचा शिरकाव गाव – खेड्यात होण्यास जास्त विलंब लागणार नाही.
म्हणुनच या सर्व गोष्टींचा परिणाम लक्षात घेता महाबळेश्वर येथील भाजपा तालुका अध्यक्ष श्री मधुकर बिरामने यांनी येथील तहसीलदार यांना त्या संदर्भात एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी आशा लोकांना सुरक्षेच्या काळजीपोटी होमेकोरोंटाईन ऐवजी इन्स्टिट्युशनल कोरोंटाईन करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. अशा करूया की प्रशासन या गोष्टींवर लवकरात लवकर निर्णय घेईल.