परळी :- कोरोना विषाणूची दहशत येवढी वाढली आहे. की फक्त नाव घेतलं तरी थरकाप उडतो. सातारा जिल्हय़ात मे महिन्याच्या अखेरीस कोरोना आपली पकड घट्ट करत होता. कराड तालुक्यातील उद्रेकानंतर आता सातारा तालुक्यातील मुंबईहून येणाऱयांच्या वाढत्या लोंढय़ांमुळे ग्रामीण भागात धडकी भरत होतीच. परळी खोऱयात मुंबईकर हे मोठय़ाप्रमाणावर दाखल झाले असता. त्यातील बहुतांश हे बाधीत आढळल्यानंतर अरोग्य विभागानेही सतर्कता दाखवत कोरोना साखळी तोडण्याचा प्रयत्न केला.
परळी खोऱयातील तरुणवर्ग हा रोजंदारीसाठी मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी मोठय़ाप्रमाणावर आहेत. कोरोनामुळे मुंबई-पुण्यातील व्यवसाय बंद त्यामुळे रोजगार मिळेणा त्यात डोक्यावरील कोरोनाचे घोंगावणारे संकट यापासून बचाव व्हावा यासाठी हजारोंच्या संख्येने चाकरनामे परळी खोऱयात दाखल झाले. त्यातील 24 मुंबईप्रवासी तसेच निकटसवासीत हे कोरोना बाधीत आढळय़ानंतर भागात एकच खळबळ उडाली होती. परळी तसेच ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रच्या सतर्कतेमुळे भागातील साखळी तोडन्यात यश मिळाले. मुंबईकरांच्या लोढय़ांमुळे परळी खोऱयातील बाधीत संख्या ही वाढत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून परळी खोऱयातील कोरोनामुक्तीच्या आकडय़ात वाढ होत असल्याने भागातील जिवनमान पुर्वपदावर येत आहे.
परळी-ठोसेघर भागातील रायघर, कुस खुर्द, खडगाव, जिमनवाडी (कारी), निगुडमाळ चाळकेवाडी ही गावे कोरोनामुक्त झाली असून कुस बुद्रुक येथील 2, वावदरे येथील 3 असे एकूण 5 रुग्ण उपचारात असून हे देखील कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. परळीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन यादव, वैद्यकिय अधिकारी डॉ. उर्मिला बनगर, ठोसेघरच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. मानसी पाटील यांचे तसेच त्याच्या टीमवर परळी भागातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
परळी खोरे कोरोनामुक्तीच्या दिशेने ; चाळकेवाडी येथील बाधित महिला झाली कोरोना मुक्त ; भागातील सर्व साखळय़ा तोडण्यात आरोग्य विभागाला यश
RELATED ARTICLES