वार्ताहर
परळी
: कित्तेक वर्षांपासून संरक्षक भित वा गावावरील दगड हटवण्याची ग्रामस्थांची मागणी
: केळवली ‘तळीये’च्या मार्गावर
: वृतांकनानंतर दरवर्षी होतो नुसता पाहणी दौरा
: ग्रामस्थांचा 2017 पासून सुरु आहे पाठपुरावा
दरवर्षी येतो पावसाळा अन् पुन्हा पुढे येतात त्याच जिवघेण्या समस्या. अशीच काहीशी सातारा तालुक्यातील केळवली गावाची अवस्था म्हणावी लागेल. केळवली हे दाट वनराईत वसलेले टुमदार असे गाव. मात्र, याच गावाच्या वर असलेल्या डोंगरावली महाकाय दगड हा केळवली गावाचा वेध घेतो की काय? अशाच भितीच्या छत्रछायेखाली ग्रामस्थ जीव मुठीत घेवून गेली कित्तेक वर्ष ढकलली जात आहेत. नुकतीच घडलेली महाड येथील तळीये गावासारखी अवस्था केळवलीची झाली तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
परळी खोरे हे अतिपर्जन्यमान असलेले ठिकाण असून याच भागातील असलेले केळवली (ता. सातारा) गाव हे दुहेरी संकटात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. डोक्यावर असलेली महाकाय दगडाची टांगती तलवार अन् वर्षानूवर्ष काडी न काडी जमा करुन उभा केलेला संसार नक्की करायचं तरी काय हा मुख्य प्रश्न
ग्रामस्थांसमोर येवून ठाकला आहे. गेली कित्तेक वर्षांपासून केळवली येथील ग्रामस्थांनी संरक्षक भिंत वा हा महाकाय दगड हटवण्याची मागणी ही वेळोवेळी प्रशासनापुढे केली मात्र ही कागदपत्रे अजुन प्रोसेसमध्ये असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र भागातील पावसाचा हाहाकार पहता तळीये-माळीण सारखी दुर्दवी घटना घडल्यावर, येथील ग्रामस्थांचे जीव गेल्यावर प्रशासन सतर्क होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरवर्षी होतो नुसताच पाहणी दौरा
पावसाळा आला की सांडवली केळवली येथील धोकादायक ठिकाणांचा अधिकाऱयांकडून फक्त पहाणी दौरा होतो. नुकसानिचे आढावे घेतले जातात. काही काळासाठी स्थलांतरीत केले जातात. मात्र कायमस्वरुपी धोका मात्र गावावर जैसे थे राहिला आहे. मग दरवर्षी दौरे करुन भविष्यात येणारे संकट टळणार नाही. दुरदैवी घडण्याआधी ठोस उपायोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.