वार्ताहर
परळी
काही दिवसांपासून वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्समधून सतत महिलांवर होणाऱया अत्याचाराच्या घटनांचे वार्ताकन करण्यात येत आहे. दररोज कोठे ना कोठे महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना सूरू आहेत. हे सर्व ऐकून एक महिला म्हणून मन सुन्न झाले. ही बाब शिवरायांच्या व पुरोगामी महाराष्ट्रात लांच्छनास्पद असून महिलांवर अत्याचार करणाऱया नराधमांना कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर ठोठावण्यात यावी. अशी कृत्ये करणाऱयांवर कठोर कारवाईच्या माध्यमातून इतरांना धडा बसावा असे निर्णय घेऊन महाराष्ट्रातील महिलांना न्याय द्यावा अशी मागणी दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षा सुनिता पाटणे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
यावेळी पत्रकात म्हटले की, मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. पुण्यातही अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला. तसेच जिह्यात जावली तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. व हे प्रकरण मिटवण्यासाठी गावातीलच सरपंच, तंटामुक्ती अदयक्ष पुढाकार घेत होते. ही गंभीर बाब आहे. जर गावातील पुढारी अशा आरोपीची साथ देणार असतील तर दादा कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे. तीही कमी कलावधीत तरच अशा नराधमांना जरब बसेल व असे घृणास्पद कृत्य करण्यास यापुढे कोणी धजावणार नाही. महाराष्ट्र राज्यात ‘रयतेचे स्वराज्य’ निर्माण करण्याचे काम आपणाकडून व्हावे अन्यथा आम्हाला अशा नराधमांना धडा शिकविण्यासाठी रस्त्यावर अतरावे लागेल.