(छाया : संजय दस्तुरे)
महाबळेश्वर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियान 2018 या अनोख्या स्पर्धेमध्ये देशात अव्वल येण्यासाठी पालिके बरोबरच शहरातील अनेक सेवाभावी संघटनांनी स्वच्छतेचा ध्यास घेवुन या अभियानात झोकुन दिले आहे विल्सन पॉइर्ंट व परीसरातील शेकडो पोती कचरा गोळा करून शहरातील सात रणरागीणींच्या या गटाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. या सात रणरागिणींच्या कामगिरीमुळे शहरात सर्वत्र अस्वच्छतेवर करण्या मात वेडात दौडल्या रणरागिणी सात अशा शब्दात त्यांचे शहरात कौतुक केले जात आहे.
शिवसेनेच्या जिल्हा संघटक लिलाताई शिंदे अर्बन बॅकेच्या माजी अध्यक्षा वृषाली डोईफोडे माजी नगरसेविका अपर्णा सलागरे त्यांच्या जावुबाई प्रज्ञा सलागरे, बचत गटाच्या प्रवर्तक राणी शिंगरे बालवाडी शिक्षिका उज्वला उगले व हॉटेल व्यवसायिक शिल्पा ठक्कर अशा सात रणरागिंची एक गट आहे गेली अनेक वर्षा पासुन हा गट शहरात वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवुन कचरा गोळा करण्याचे काम करीत असतात स्पर्धा असो अथवा नसो सातत्याने स्वच्छता मोहीम राबवून पालिकेला स्वच्छते साठी हातभार लावणे या एकाच ध्येयाने हा महिलांचा गट गेली अनेक वर्षे शहरात काम करीत आहे स्वच्छता अभियान सुरू झाल्या पासुन या महिलांच्या गटाने या मोहीमेत स्वत:ला झोकुन देवुन काम करण्यास सुरूवात केली आहे काही दिवसांपुर्वी महिलांच्या या गटाचे पालिकेने सन्मानही केला होता परंतु त्या नंतर उलट अधिक जोमाने या रणरागिणी कामाला लागल्या या महीलांनी पालिके कडुन वन विभागाच्या अख्त्यारित येत असलेला विल्सन पॉइर्ंट स्वच्छतेसाठी दत्तक घेतला विल्सन पॉइर्ंट हा सुर्योदय पाहण्यासाठी प्रसिध्द आहे परंतु रात्री तळीरामांचा अड्ड्ा म्हणुन हा पॉइर्ंट शहरात प्रसिध्द आहे कोणीही येतो पॉइर्ंटवर दारू पितो रात्री अपरात्री नेशेत दारूच्या बाटल्या दगडावर आपटुन फोडणे हा तळीरामांचा आवडता खेळ बनला आहे त्यामुळे या पाँईटवर फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो त्या शिवाय चकण्यासाठी खण्यापिण्यासाठी आणलेल्या मोकळया बाटल्या कागदा कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांचा चकण्यांच्या पाकीटांचा खच पडलेला दिसतो हा पॉइर्ंट वनविभागाच्या मालकिचा परंतु वन विभागास या पॉइर्ंट पासुन उत्पन्न मिळत नसल्याने वन विभागही या पॉइर्ंटकडे दुर्लक्ष करीत आहे त्या मुळे या पॉइर्ंटवर तळीरामां प्रमाणेच सकाळी सुर्योदय पाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होत असतो असा हा पॉइर्ंट या सात महीलांच्या गटाने स्वच्छतेसाठी दत्तक घेतला.
या महिला काही दिवसां पासुन रोज सकाळी पालिकेने दिलेले हातमोजे कचरा गोळा करण्यासाठी प्लास्टिकची पोती दुपारच्या भोजनाचा डबा बरोबर घेवुन थेट विल्सन पॉइर्ंट गाठतात उन्हा पासुन रक्षणासाठी डोक्यावर टोपी गळयात स्वच्छागृही असलेले पालिकेचे ओळखपत्र घेवुन सकाळीच कामाला सुरूवात करतात पॉइर्ंटवर असलेल्या दारूच्या बाटल्या फुटलेल्या बाटल्याचे तुकडे व इतर सर्व प्रकारचा कचरा गोळा करतात प्रारंभी या महिलांना येथे रोज तीस ते चाळीस पोती कचरा सापडत होता परंतु अलिकडे रोज दहा ते पंधरा पोती कचरा सापडतो गेली अनेक दिवस स्वच्छता मोहीम राबवुन या पॉइर्ंटवर तळीरामांचा राबता काही कमी झाला नाही त्या मुळे या महीला रोज कचरा गोळा करीतच आहे आता या महिलांनी सोशल मिडीयावरून शहरातील तळीरामांना आवाहन करण्यास सुरूवात केली आहे या पॉइर्ंटवर दारू पिण्यासाठी जावू नका आणि गेलाच तर बाटल्या फोडु नका या आवाहनास अद्याप तळीरामांनी प्रतिसाद दिला नाही परंतु या महीलांनी आता वन विभागाला व पोलिस विभागाला या पॉइर्ंटवर कचरा करणारे तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे तसेच पालिकेला या ठिकाणी डस्टबीन लावुन सुचना फलक लावण्याची विनंती केली आहे या महीलांच्या विनंती नुसार पालिकेने डस्टबीन व फलक लावण्याच्या हालचाली सुरू केल्या असुन तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस रोज रात्री गस्तीसाठी पॉइर्ंटवर जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले तर वन विभाग या पॉइर्ंटकडे अधिक लक्ष पुरविणार असल्याचे वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांनी सांगितले आहे.
तळीराम रोज जावुन कचरा करतात व या महीला तो कचरा न थकता या महीला गोळा करतात त्यांच्या कामगिरीने शहरातील सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले असुन सर्व शहरातुन अस्वच्छतेवर करण्या मात वेडात दौडल्या रणरागिणी सात अशा शब्दात या सात महीलांच्या गटाचे कौतुक केले जात आहे.