सातारा : येत्या भविष्य काळात सोनगाव बरोबर संपूर्ण गटाचा कायापालट करण्याचा आम्हा उभयतांचा मानस आहे आणि ते फार अवघड आहे असे मुळीच नाही, कारण केंद्रात आणि राज्यात बीजीपी ची सत्ता आहे आणि खा. श्री. छ. उदयनराजे यांच्या माध्यमातूनही येत्या भविष्य काळात भरपूर निधी आपण आपल्या गटासाठी खेचून आणु आणि वनवासवाडीचा वनवास विकासकामांच्या माध्यमातुन कायमचा दूर करू, असे शाहूपूरी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदिप शिंदे यांनी सांगितले. सोनगाव सं. नींब ता. सातारा या ठिकाणी गाव भेटीस गेले असता संदिप शिंदे बोलत होते. यावेळी वैभव शिंदे, रमजान मुलाणी, दत्ताञेय मारूती शिंदे, तुषार नलवडे, शंकर वसंत शिंदे, विनायक मुगुटराव गायकवाड, हरिश्चंद्र नथु गायकवाड, प्रदीप शंकर शिंदे, लक्ष्मण आण्णा शिंदे तसेच सोनगाव ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संदिप शिंदे यांनी संपूर्ण गावची पाहणी केली. शाळेची इमारत, शाळेतील पाण्याची टाकी, मुस्लिम कब्रस्तान, स्मशानभुमी कडे जाणारा नाला अशा अनेक कामांची पाहणी करत असताना उर्वरीत कामांचा आराखडा सुद्धा त्यांनी तयार केला.
त्याचप्रमाणे खरंच विकासकामांचा वनवास असलेल्या वनवासवाडी गटातील जनतेनी भारतीय जनता पार्टीकडून उभ्या असलेल्या माझ्या सुविद्य पत्नी सौ. रेश्माताई शिंदे यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणुन भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या माध्यमातूनही युवक व महिला वर्गाला एकञित करून रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस असून भविष्यात युवक-युवतींनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा, यासाठी त्यांना प्रशिक्षित करू, असेही श्री. शिंदे म्हणाले. यावेळी बोलताना रमजान मुलाणी यांनी सांगितले की, संदिप शिंदे यांनी शाहुपूरी येथे विकासकामांचा डोंगर उभा केला होता. म्हणून त्यांची ओळख एक कामसु कार्यकर्ता म्हणून आमच्या भागातही कायम आहे. त्यांच्या माध्यमातून वनवासवाडी गटातही चांगली कामे होतील, अशी अपेक्षा आहे असे ते म्हणाले. गावची पाहणी करत असताना संदिप शिंदे यांनी गावासाठी भरघोस निधीही मंजूर केला. शाळा दुरूस्ती साठी रू. २ लाख, स्मशानभुमिकडे जाणा-या नाल्यासाठी रू. ३ लाख, मुस्लिम कब्रस्तान साठी रू. ४ लाख असा एकुण रू. ९ लाखांचा निधि जिल्हा परिषद सदस्या रेश्माताई शिंदे यांच्या फंडातून मंजुर झाल्याचे सांगितले. शाळेच्या पाण्याच्या टाकीचे सांडपाणी हे नेहमीच रस्त्यावरून वाहत असते त्यामुळे गावात दुर्गंधी पसरते, अशी तक्रार गावक-यांनी केली. पण त्या कामांसाठी लगेच शासनाचा कोणताच निधी उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वःखर्चाने करण्याचे आश्वासन दिले व तशा सुचनाही त्यांनी लगेच खाजगी कंञाटदारांना दिल्या. या सर्व कामांबरोबर गावातील दलितवस्तीचा सुद्धा आराखडा तयार करून संपूर्ण दलितवस्तीचा कायापालट करण्याचे आश्वासनही संदिप शिंदे यांनी दिले.
फक्त गाव पाहणीसाठी आलेले संदिप शिंदे यांनी गावासाठी लगेचच रू. ९ लाखांचा निधी मंजूर केल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. — वैभव शिंदे.