कराडः सवंग लोकप्रियतेसाठी अच्छे दिन सारख्या मोठ-मोठ्या घोषणा केल्या गेल्या भावनिक बोलुन लोकांची दिशाभूल करण्याचं काम भाजप सरकारने केले. मागामी निवडणुकीमध्येही विकासाच्या मुद्द्यावर काही बोलण्यासारखे नसल्याने चौकीदार चौकान्ना आहे या सारख्या भावनिक घोषणा देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे, चौकीदार चौकान्ना आहे तर मग नीरव मोदी आणि विजय मल्ल्या का पळून गेले असा प्रश्न यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित केला.
ते राष्ट्रवादी, काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शिरवडे ता.कराड येथे आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील-चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, 2014 च्या लोकसभा निवडनिकीपूर्वी भाजप ने अच्छे दिन आयेंगे, सरसकट कर्जमाफी, प्रत्येकी खात्यावर पंधरा लाख रुपये जमा होणार, अशी खोटी आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले, भावनिक बोलून लोकांची दिशाभूल केली गेली. म्हणून या पुढील काळात सरकारच्या कोणत्याही घोषणा व आस्वासनांना बळी न पडता, आदरणीय शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले
मानसिंगराव जगदाळे पुढे म्हणाले की, सरकारमार्फत राबवल्या जाणार्या योजना शेतकर्यांपर्यंत पोहचत नाहीत कर्जमाफी ची घोषणा केली गेली व जाचक अटी व निकष लावून शेतकर्याची चेष्टा करण्याचं काम या सरकारने केले आहे. शरद पवारसाहेब देशाचे कृषिमंत्री असताना 72000 कोटी रुपये सरसकट कर्जमाफी करून शेतकर्याला संजीवनी देण्याचं काम केलं होतं म्हणून आदरणीय शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडी चे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील-चिखलीकर म्हणाले की, यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना ब्रिटिशांशी दोन हात करण्याची ताकद त्यांच्याकडे होती. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये अनेक छोटे-मोठे कारखाने निर्माण झाले व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. म्हणून यशवंत विचारांचा वारसा जपण्यासाठी सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहून त्यांना पुन्हा एकदा लोकसभेवर पाठवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सुनील माने म्हणाले की देशातील काळा पैसा परत आणणार प्रत्येकी खात्यावर 15 लाख रुपये जमा होणार दोन कोटी तरुणांना नोकर्या देणार सरसकट कर्जमाफी करणार करून सत्तेवर आलेल्या सरकारने पाच वर्षात लेखी आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे यापुढील काळात देशातील आर्थिक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी व शेतकर्यांच्या हितासाठी देशाचे नेते माजी कृषीमंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना लोकसभेवर पाठवून साहेबांचा हात बळकट करण्याचे आवाहन यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बी.के.जगदाळे, राजन पाटील, दत्ता शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याचे सुत्रसंचालन अंकुश पवार यांनी, प्रास्ताविक कारखान्याचे संचालक संजय जगदाळे यांनी केले तर आभार अशोक पवार यांनी मानले.यावेळी कारखान्याचे संचालक पै.संजय कुंभार, भागवत घाडगे, किसनराव घाडगे, दत्ता शेलार, मोहन पवार, ताजुद्दीन मुल्ला, भीमराव जाधव, सिद्धार्थ चव्हाण, नेताजी चव्हाण, उत्तम चव्हाण, अर्जुन चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र चव्हाण, शुभम चव्हाण, संपतराव चव्हाण, सर्जेराव थोरात, बी के जगदाळे, संजय जगदाळे, दिनकर थोरात, बाळकृष्ण जगदाळे, हणमंत पाटील, बाळासो जगदाळे, अंकुश पवार, अशोक पवार, पतंगराव जगदाळे, अनिल जगदाळे, रामभाऊ जगदाळे, सुनिल जगदाळे, नथुराम पाटील, राजन पाटील, हणमंत पवार, महादेव पाटील, गणेश शिंदे, दादासो पवार, रमेश जगदाळे, अंकुश थोरात, आनंदराव पाटील, मुनीर संदे, विजय जगदाळे याचेसह कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, नडशी आदि गांवातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकीदार चौकन्ना आहे, तर मग नीरव मोदी, विजय मल्या का पळून गेलेःआ. बाळासाहेब पाटील
RELATED ARTICLES