औंध:औंध जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना विक्रमी मताधिक्य देणार असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केले.
औंध जिल्हा परिषदेतील कोकराळे ,लोणी,भोसरे धकटवाडी,अंभेरी,जायगाव, कोकराळे आदी गावांचा झंझावाती दौरा आयोजित करण्यात आला होता, यावेळी उमेदवार संजय शिंदे,माजी आ.प्रभाकर घार्गे,समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, माजी सभापती संदिप मांडवे ,हणमंत शिंदे,राजेंद्र माने,आब्बास आतार, विविध गावचे सरपंच ,उपसरपंच विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आ.प्रभाकर घार्गे म्हणाले ग्रामीण अर्थव्यवस्था ,शेतकरी ,व्यापारी यांचे जीवनमान उध्वस्त करणार्या विद्यमान सरकारची घटका भरली असून यापुढील काळात खर्या अर्थाने ग्रामीण विकास साधावयाचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार केंद्रात सत्तेवर आणण्यासाठी ग्रामीण जनतेने जागृकपणे मतदान करणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले खटाव माण तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसून काढण्यासाठी आपण प्राधान्याने याभागातील पाणी योजनांना गती देणार आहोत त्याचबरोबर तरूणांना रोजगार, हाताला काम मिळवून देण्याची क्षमता फक्त एकआघाडी सरकार मध्ये आहे.
त्यामुळे औद्योगिकीकरण ,शेती पाणी प्रश्न, जीएसटी तसेच शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस व मित्र पक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.
औंध जि.प. गटातून संजयमामा यांना मताधिक्य देणार:गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी
RELATED ARTICLES