महाबळेश्वरः केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये बाजी मारण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने कंबर कसली असुन पालिकेचे लोकप्रतिनिधी अधिकारी व सर्व कर्मचारी हे रात्रं दिवस मेहनत घेताना दिसत आहे त्या मुळेच पालिकेला मिळणारे रॅकिंग मध्ये रोज सुधारण होत असुन लवकरच पालिका पहील्या पन्नास मध्ये समाविष्ठ होणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी व्यक्त केला आहे
देशातील महानगर पालिका व नगरपालिकांमध्ये स्वच्छता अभियान राबवुन स्पर्धा घेण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे या स्पर्धेत देशातील चार हजार पालिकानी सहभाग घेतला आहे या पालिकांमध्ये गेली अनेक दिवसां पासुन स्वच्छतेचे काम मोठया प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे रोज केलेल्या कामाकाजाचा आढावा केंद्र शासनाकडुन घेतला जातो या कामकाजाच्या आधारे रोज पालिकांचे रेटींग जाहीर केले जाते मागील आठवडयात महाबळेश्वर पालिका चार हजार पालिकांमध्ये 334 क्रमांकावर होती चार दिवसांपुर्वी पालिकेच्या रेटींग मध्ये चांगली सुधारणा झाली त्या मुळे 295 क्रमांकावर आली एका दिवसात पुन्हा महाबळेश्वर पालिकेने उसळी मारली त्या मुळे महाबळेश्वर पालिकेला 242 क्रमांकाचे रेटींग मिळाले आज पुन्हा महाबळेश्वर पालिका 141 क्रमांकावर आहे सध्या चार हजार पालिकांमध्ये सर्व्हेक्षणाचे काम सुरू असले तरी पहील्या पन्नास मध्ये आलेला पालिकाच स्पर्धेसाठी पात्र ठरणार असल्याने महाबळेश्वर पालिकेेला रेटींग मध्ये मोठी सुधारणा करून घ्यावी लागणार आहे या सर्व्हेक्षणात जनतेचा सहभाग वाढला पाहीजे जनतेने पालिकांच्या सुचनांचे काटेकोर अंमलबजावणी केली पाहीजे तसेच जनतेने मोठया संख्येने आपल्या मोबाईल मध्ये स्वच्छता अॅप डाउनलोड केला पाहीजे या अॅप व्दारे आपण तक्रारी केल्या पाहीजेत आपण केलेल्या तक्रारींचे निवारण केले जाते की नाही याची खात्री करून घेतली पाहीजे जर आपण केलेल्या तक्रारीचे निवारण पालिकेने तात्काळ केले असेल तर पुन्हा आपण स्माईली देवुन समाधान व्यक्त केले पाहीजे या सर्व गोष्टींची केद्र शासना कडुन पाहणी केली जाते व त्या प्रमाणे पालिकेला गुण दिले जातात या रेटींग सुधारण्यास या गुणांचाही फायदा पालिकेला होत असतो
स्वच्छता अॅप प्रमाणेच पालिकेला सर्व्हेक्षणात रोज काय काय करायचे याच्या स्पष्ट सुचना शासनाकडुन ऑन लाईन केल्या जातात त्या सुचना प्रमाणे पालिकेने दिवसभर काम करून त्याचा अहवाल केंद्र शासनाला ऑन लाईन पाठवायचा आहे आणि त्या आधारावर पालिकेला गुण देवुन त्या नुसार रेटींग जाहीर केले जाते.
सध्या या रेटींग मध्ये जरी सुधारणा होत असली तरी पहील्या पन्नास मध्ये येण्यासाठी पालिकेला मोठी धावपळ करावी लागणार आहे नागरीकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवावा , शौचालयाचा वापर करावा मोबाईल मध्ये स्वच्छता अॅप डाउन लोड करून आपल्या भागातील स्वच्छते विषयी तक्रारी ऑन लाईन पाठवाव्या या पध्दतीने जनतेने या सर्व्हेक्षणात पालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी केले आहे