वडूज : लोकसभा निवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासठी पोलिस प्रशासन सरसावले असून, खटाव माण तालुक्यात येणार्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर शांतता भंग होऊ नये म्हणून कलम 107अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे, मात्र या कालावधीत कोणी गुंडगिरी केलीच तर त्याला सोडणार नाही असा इशाराच पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे यांनी दिला आहे.
निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागले आहे. या निवडणुकीत अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चांगलीच कडक मोहीम राबविली आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या वाहन तपासणीत अवैध वाहतूक करणार्यांना ही ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे.
तसेच चांगल्या वर्तणुकीचे बॉँड लिहून घेत कलम 110 नुसार ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, अशावर कारवाई करण्यात आली. सतत अवैध दारू विक्री करणारे, पोलिस दप्तरी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांवर कलम 93नुसार तडीपारी प्रस्तावित आहे. माराहाण करून दुखापत करणार्या काही जणांविरोधात हद्दपारचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे.
वडूज पोलिस ठाण्यासह दोन्ही तालुक्यातील पोलिस ठाण्यांतर्गत निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासठी पोलिस कर्मचार्यांची पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाची गुन्हेगार, अनोळखी व्यक्ती, अवैध धंदे, बेकायदेशीर वाहतूक यासह गुन्हेगारी वृतीच्या लोकांवर करडी नजर राहणार आहे. तर काहीजणांवर तात्पुरती तडीपारीची कारवाई केली असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे.
निवडणुकीचा काळ हा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी चांगलीच यंत्रणा राबविली आहे. तर सध्या वडूज सह परिसरातील काही अवैध व्यवसाय करणार्यांना पोलिसांनी टार्गेट केले आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र आहे. यावेळी बोलताना प्रा. शेटे, श्री. माने, क्षीरसागर व खुडे यांनी सरतापे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तसेच अनाथ विद्यार्थ्यांना मिस्टान्न वाटप करणे हा मनस्वी समाधानाचा कार्यक्रम असल्याचे सांगितले. श्री. वावरे यांनी स्वागत केले. अशोकराव गलंडे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेच्या वतीने श्री. सरतापे यांचा सत्कार करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत गुंडगिरी करणार्यांना सोडणार नाही : अनिल वडनेरे
RELATED ARTICLES