भुईंज ःमहाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या मार्फत त्यांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागण्या पुर्ण होत नाहीत पर्यंत आंदोलन चालुच राहील. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आमरण उपोषण करणार असल्याचे सातारा जिल्हा कोतवाल संघटनेने सांगितले आहे.
याबाबत सातारा जिल्हा कोतवाल संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात कोतवाल हे पद ब्रिटीशकालापासून चालत आलेले पद आहे. परंतु आज भारताला स्वतंत्र मिळून 70 वर्षे झाली परंतु कोतवाल हा दुर्लक्षीत घटक राहिलेला आहे.
भारत देश हा कृषीप्रधान देश असून महाराष्ट्रात एकूण 12637 कोतवाल काम करीत आहेत. आम्हाला मिळणारा मोबदला हा पाच हजार नऊ रूपये हा पगार नसून मानधन स्वरूपात दिला जातो.
या मानधनाच्या बदल्यात 24 तास काम करावे लागते. कोतवाल हा महसूल खात्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी वर्गाचे आदेशाचे पालन करीत असतो.
आम्ही आंदोलन पुढील मागण्यासाठी करीत आहे 1. राज्यातील कोतवालांना विनाविलंब चतुर्थ श्रेणी बहाल करावी.
2.कोतवालांना तलाठी व तत्सम पदासाठी 50 टक्के पदोन्नती मिळावी
3.सेवा निवृत्त कोतवालांना पेन्शन व वारसांना सेवेत संधी मिळावी
4.दिनांक 27 आक्टोबर 2018 च्या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती जे.एस.केअर आणि एम.एस.बोंबडे यांच्या खंडपिठाने समान काम समान वेतन या निर्णयाची राज्यात कोतवालांना अंमलबजावणी करावी.
5.वाळू तस्कारांनाकडून कोतवालांना मारहाण करर्णायावर कठोर कारवाही करण्यात यावी.
6.कोतवालाची शासकीय बंगल्यावर नियुक्ती रद्द करणेबाबत
वरील मागण्या मान्य झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण व विद्रोही आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच लोकप्रतिनिधी म्हणुन आपल्या माध्यमातून आमच्या अडचणी शासन दरबारी मांडून कोतवालांना योग्य न्याय मिळवून देण्याचे ही निवेदनात म्हटले आहे.
कोतवाल संघटनेच्या मार्फत त्यांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरूच
RELATED ARTICLES