सातारा :- शिक्षण उद्योग नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पुणे -मुंबई व अन्य ठिकाणी गेलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यात आपल्या मूळ गावी परतले जिल्ह्यात आज आखेर सुमारे तीन लाख 4हजार402 नागरिक दाखल झाले आहेत. त्यामुळे गावोगावच्या वाड्या-वस्त्या गजबजून गेल्या आहेत. गेल्या दीड महिना करोंना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात टाळेबंदी सुरू आहे. राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत .मात्र काही ठिकाणी प्रशासनाने घातलेले निर्बंध आता टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत.
सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शहरातून आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. जावली तालुक्यात 47 हजार तीन कराड तालुक्यात 19 हजार158 .खंडाळा तालुक्यात 19 हजार 135 खटाव तालुक्यात 24 हजार चौदा, कोरेगाव तालुक्यात 26 हजार 997 महाबळेश्वर तालुक्यात 18,108 माण तालुक्यात 23 हजार 381 ,पाटण तालुक्यात 39 हजार 567 ,फलटण तालुक्यात 29 हजार882 ,सातारा तालुक्यात तीस हजार 390 ,वाई तालुक्यात 26,715 असे एकूण मिळून तीन लाख 4 हजार402 नागरिक पुणे मुंबई व अन्य ठिकाणाहून आपल्या मूळ गावी परतले आहेत .अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पुणे मुंबई व अन्य ठिकाणी केलेले नागरिक गावी पोहोचताच या नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या पथकांना सामोरे जावे लागले. प्रत्येक गावात पोलीस पाटील ,आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या मार्फत बाहेरून आलेल्या या सर्व नागरिकांची नोंदणी करण्यात येत आहे तसेच सर्व नागरिकांना होम क्वारंनटाइन मध्ये राहण्याच्या सूचना आरोग्य पथकामार्फत देण्यात आल्या आहेत.