मायणी:(सतीश डोंगरे मायणी): विश्वरत्न,बोधीसत्व ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जि प प्राथमिक शाळा गुंडेवाडी मराठानगर येते संपन्न झाला.प्रारंभी शिवाजी माने,एकनाथ निकम ,विश्वनाथ निकम ,बाबुराव निकम यांचे हस्ते प्रति मा पूजन करून अभिवादन केले .यानिमित्त आयोजित केलेल्या बालसभेत प्रणाली निकम ,सानिका निकम ,अवधूत निकम ,ओम निकम ,आदित्य निकम,समृद्धी निकम ,गौरव निकम यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रकारच्या घटना ,प्रसंग सांगितले.मुख्याद्यापक बाळासाहेब कांबळे बोलता ना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे ,शोषितांचे उद्धारक नव्हते तर ते राष्ट्र उद्धारक होते.सामाजिक भेदाभेद नष्ट करून मानव कल्याणकारी लोकशाही स्थापन करण्यासाठी त्यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून हक्क मिळवून दिले. विधीशास्त्र,राज्यशात्र,समाजशात्र,धर्मशास्त्र,अर्थशात्र,पत्रकारिता या विविध क्षेत्रातील बाबासाहेबांचे उत्तुंग कार्य जगाला प्रेरणादायी आहे.समतेच्या तत्वावर आधारीत राष्ट्रनिर्मितीचा पाया बाबासाहेबानी रचला.त्यांचे विविध विषयांवरील तत्वनिष्ठ विचार व संकल्पना आजही सर्वासाठी मार्गदर्शक आहेत. बाबासाहेबांचा विश्वव्यापी मानवतावाद स्पष्ट करून बाबासाहेबांची व्यासंगता व्यक्त केली. उपशिक्षिका दीपाली सुधाळ यांनी मनोगत व्यक्त केले. तनुजा माने हिने सूत्रसंचालन केले,पार्थ उदंडे याने आभार मानले.