सातारा- जिल्हयातील धरणग्रस्तांचा विविध प्रश्नांवर भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेवुन धरणग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्या संदर्भात चर्चा केली.
याबाबत अधिक माहीती अशी की, आज जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे भारतीय. जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते मा. श्री माधवजी भंडारी अध्यक्ष , जनजागर प्रतिष्ठान , महाराष्ट्र मा.अतिरीक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड मा.माधव कुलकर्णी राज्य समन्वयक जनजागर प्रतिष्ठान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे आयुक्त कार्यालय येथे झालेल्या सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीतील निर्णयांचा मुद्देसूद आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी धोम, कन्हेर , महू-हातगेघर, कोयना धरणग्रस्तांच्या विविध पुनर्वसनाच्या विषयांवर उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन ) श्रीमती आरती भोसले मँडम , कृष्णा खोरेचे उपअभियंता श्री गाडे सर,सातारा जिल्हा समन्वयक श्री देवराज देशमुख , कन्हेर धरणग्रस्तांचे श्री काशिनाथ बैलकर साहेब, धोम धरणग्रस्तांचे श्री विरकर , महू-हातगेघर धरणग्रस्तांचे श्रीहरी गोळे , पुणे जिल्हा समन्वयक संतोष दीघे , शिवाजी चव्हाण , कन्हेर मधील श्री पंडीतराव , श्री दत्तात्रय साळूंखे त्याचप्रमाणे बहुसंख्येने धरणग्रस्त उपस्थितीत होते.
अतिशय वेगाने , पारदर्शी पणे, कोणत्याही अडथळ्याविना पुनर्वसीतांचे प्रश्न धरणग्रस्त आणि शासन यांनी एकत्रितपणे सोडविण्याचा विचार यावेळी अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला.
धरणग्रस्तांचा प्रश्न लवकरच सोडवु – भाजप प्रवक्ते भंडारी
RELATED ARTICLES