मुंबई :- (शंकर मोहिते) – महाराष्ट्रातील जनतेच्या विकास कामासाठी असलेल्या मंत्रालयात मंगळवार, बुधवार आणि गुरवार हे तीन दिवस गर्दीचे ठरले. प्रवेश पासासाठी असलेल्या खिडकी जवळ झालेल्या गर्दीत नागरीकांनी गोंधळ घालून ढकला-ढकली व धक्का-बुक्की केली. वेळीच या गर्दीत पोलिसांनी शिरून हस्तक्षेप केला. अन्यथा मंगळवारचा दिवस मंत्रालयाच्या प्रवेश गेटवर धक्का-बुक्की व चेंगराचेंगरी चा झाला असता. मंगळवारी मंत्रालयाच्या दोन्ही प्रवेश व्दारावर नागरीकांची हाजारोंच्या संख्येने गर्दी होती. दुपारी दोन नंतर नागरिकांना प्रवेश मिळत असल्याने पासासाठी लावलेल्या रांगेतच मंत्रालय बंद होण्याची वेळ होत होती. यामुळे नागरिकांना कामाविना परतावे लागले. महाराष्ट्रातून विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सकाळी अकरा वा. पासूनच मंत्रालयात प्रवेश मिळावा अशी मागणी यावेळी राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी केली.
सरकार लोकांची कामे करत नाही म्हणून नागरिकांना थेट मंत्रालयात याव लागत. अशा प्रतिक्रिया गर्दीतील नागरीकांच्या होत्या. तर याच वेळी लोकांची कामे होतात म्हणून नागरिकांची मंत्रालयात गर्दी होते. अशाहि प्रतिक्रिया येत होत्या. या उलट-सुलट चाललेल्या प्रतिक्रयेत अधूनमधून गर्दीच्या रांगेत नागरिकांचा गोंधळ ढकला-ढकली व धक्का-बुक्की होत होती. मंत्रालयात प्रवेश मिळण्याची वेळ दुपारी दोन ची आसल्याने एक वाजल्यापासून प्रवेश पासाच्या खिडकीजवळ राज्यभरातून विविध कामासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी होत असते. आकशवानी आमदार निवास स्थानासमोरील गेट व विधान भवन समोरील गेटवर नागरिकांच्या लांबच – लांब रांगा लागल्या होत्या. मंत्रालयात लवकर प्रवेश मिळावा व आपले काम व्हावे. या उद्देशाने प्रत्येक जण दडपडत होता. मात्र या गर्दीतील काहीजणांची रांगेतच वेळ संपली. नागरिकांना निराश होऊन परतावे लागले. सायंकाळी साडेपाच वा. कार्यालयीन वेळ संपत असल्याने आधिकारी – कर्मचारी घरी जाण्याची वेळ आणि नागरिकांची मंत्रालयात येण्याची वेळ एकच होत असल्याने अनेक नागरिकांना कामाविना निराश होऊन परतावे लागत आहे.
आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरवार सर्व मंत्री अधिकारी मंत्रालयात हजर असतात. बुधवारी मंत्र्यांची कैबिनेट बैठक असते. तर मंगळवार, गुरवार मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठका असतात. सरकारचा कार्यकाळ संपत आल्याने अपुरी राहिलेली कामे पूर्ण करण्याची लागलेली गडबड किंबहुना यासाठी कार्यकर्ते, नागरिकांची गर्दी मंत्रालयात होताना दिसते. राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरीकाला मंत्रालयात प्रवेश सुलभ व त्रासाविना मिळावा यासाठी प्रवेश पास खिडक्यांची संख्या वाढवावी. अथवा नागरिकांना सकाळी अकरा वा. पासून मंत्रालयात प्रवेश मिळावा. अशी मागणी मंत्रालयाच्या प्रवेश व्दारावर त्रास सहन केलेल्या कार्यकर्ते – नागरिकांच्यातून होत आहे.