ढेबेवाडीः कष्टक़र्यांच्या नेतृत्वाचा सन्मान करण्याची वेळ आता आली आहे.ही संधी कदापीही गमावू नका.नरेंद्र पाटील यांना खासदार बनवून सातारा जिल्ह्याला दिल्लीशी जोडणारा एक मजबूत धागा बना असे अवाहन होम मिनिस्टर फेम अभिनेते आदेश बांदेकर यांनी आज रात्री ढेबेवाडी येथे आयोजित सभेत केले.
सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.ते म्हणाले,मुंबईतील कष्टकरी माथाडीच्या जिवनाशी माझी लहाणपणापासून ओळख आहे. माथाडी कामगारांची मुले ज्या शाळेत शिकली त्याच शाळेत माझेही शिक्षण झाले आहे.नरेंद्र पाटील यांच्या रूपाने कष्टकऱयांचे नेतृत्व आता दिल्लीत पोहचणार आहे. त्यांच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याचा नक्कीच सर्वांगीण विकास होईल.सर्वसामान्य कुटूंबातील एक व्यक्ती खासदार बनवून दिल्ली दरबारी पाठविण्याची सुवर्णसंधी सातारच्या जनतेने गमावू नये.शिवसेना हे एक खूप मोठे कुटूंब आहे.या कुटूंबातील हे नेतृत्व तुमच्या स्वप्नांना सत्यात आणेल.अत्यंत विश्वासाने त्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्या जिल्ह्याचा सन्मान दिल्ली दरबारी वाढवा. शिवसेना जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार म्हणाले,पाटण तालुक्याला खासदारकीची परंपरा आहे.मध्यंतरी आपल्या तालुक्यातून गेलेली खासदारकी पुन्हा खेचून आणण्याची संधी आता आली आहे.पाटण तालुक्याच्या सुपूत्राला तालुक्यातून शंभर टक्के मतदान मिळालेच पाहिजे.घरात राहून घरभेदी करणारांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.शंभूराज देसाई म्हणाले,शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अत्यंत विश्वासाने दिलेल्या या नेतृत्वाला मोठ्या मताधिक्यांनी खासदार बनवून दिल्लीत पाठविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करावे.आपल्या सर्वांवरच ही मोठी जबाबदारी असून रूसवे,फुगवे आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर जावून शिवसेनेचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवा.जिल्ह्यात सर्वाधीक मताधिक्य पाटण तालुक्यातूनच गेले पाहीजे याची काळजी घ्या.माथाडी संघटनेच्या उभारणीत (कै) आमदार अण्णासाहेब पाटील यांना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी खंबीर साथ दिली होती.तशीच साथ आता नरेंद्र पाटलांना देवून त्यांच्या पाठीशी खंबीर ताकद उभी करूया.मुंबईत जेव्हा शिवसेना आणि माथाडी संघटना हातात हात घालून काम करेल तेव्हा कुणाचीही वाकड्या नजरेने बघायची हिंमत होणार नाही.यावेळी डॉ.सौ.प्राची पाटील,पोपटराव देशमुख,एकनाथ जाधव,मनोज मोहिते यांची भाषणे झाली.जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे,आयेशा सय्यद,डी.आर.पाटील,कविता कचरे, दिपक महाडीक,माथाडी संघटनेचे अध्यक्ष एकनाथराव जाधव आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.रणजीत पाटील यांनी प्रास्ताविक केले. रघुनाथ जाधव यांनी आभार मानले.
कष्टक़र्यांच्या नेतृत्वाचा सन्मान करण्याची वेळ आली आहे ही संधी गमावू नकाः आदेश बांदेकर
RELATED ARTICLES