महाबळेश्वर : नाताळ हंगाम तोंडावर आला असतानाच रिलायन्स जिओ व्होडाफोन या दोन टेलीकम्युनिकेशन कंपनीने पांचगणी व महाबळेश्वर या दरम्यान रस्ता खुदाई करून केबल टाकण्याचे सुरू केलेले काम आज संतप्त शिवसैनिकांनी बंद पाडले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या कामावर असेलेल्या कामगारांना काम बंद करण्यासच सांगितले नाही तर गेली दोन दिवस खोदलेेला रस्ताही बुजवुन घेण्यात आला.
महाबळेश्वर-पांचगणी हा रस्ता राजमार्ग म्हणुन ओळखल जातो. दोन्ही बाजुला घनदाट जंगल असल्याने या रस्त्या वरून जेमतेम दोन वाहने जावु शकतात नाताळ हंगामात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढते वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहन ओलांताही येत नाही त्यामुळे अवजड वाहनांच्या मागे लहान वाहनांची मोठी रांग लागते अशा वेळीच जर रस्ता खुदाई केली तर या खुदाई मुळे मुळात अरूंद असलेला रस्ता अधिकच अरूंद होणार मग या अरूंद झालेल्या रस्त्यावर मोठी वाहतुकीची कोंडी होणार अशा वाहतुकीच्या कोंडीमध्ये हजारो पर्यटक अटक्ण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाताळ काही दिवसांवर येवुन ठेपला आहे. गेली दोन दिवसांपासून जिओ व व्होडाफोन या दोन कंपनीने आपले रस्त्याच्या कडेने खुदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहेे या खुदाईची माती रस्त्याच्या कडेला पडली असल्याने गेली दोन दिवस या भागात वाहतुकीची कोंडी होत आहे या संदर्भात अनेक नागरीकांनी व पर्यटकांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या आज दुपारी जिल्हा प्रमुख यांनी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे, शहर प्रमुख विजय नायडु व इतर अनेक शिवसैनिकांना बरोबर घेवुन ज्या रस्त्यावर केबल टाकण्याचे काम सुरू होते तेथे जावुन पाहणी केली असता या खुदाई मुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसली तसेच खुदाईची माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यात पडल्याने रस्ता अरूंद झाला होता. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी केबल टाकण्याचे काम बंद पाडले व खोदलेले रस्ताही त्यांनी कामगारांकडुन बुजवुन घेतला.
या संदर्भात ठेकेदार यांच्या बरोबर जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांनी चर्चा केली. कुंभारदरे म्हणाले की, सध्या नाताळ हंगाम आला आहे या हंगामात पर्यटकांची मोठी आवक होते त्या मुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढते तुमच्या या कामामुळे पर्यटकांना वाहतुकीच्या कोडीत अडकुन पडावे लागणार आहे त्याचा येथील पर्यटनावर विपरीत परिणाम होणार आहे तेव्हा हे काम तात्काळ बंद करा व नाताळ हंगाम पुर्ण झाल्यानंतर हे काम तुम्ही सुरू करा अन्यथा आम्हाला आमच्या पध्दतीने हे काम बंद करावे लागेल असा इशाराही त्यांनी ठेकेदारास दिला. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहुन ठेकेदाराने काम बंद करण्याचा निर्णय घेतला तसेच काम खुदाईचे काम बंद करून खोदलेला रस्ताही माती टाकुन बुजवूून घेतला.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांचे बरोबर युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे, शहर प्रमुख विजय नायडु, संतोष जाधव, वाहतुक सेनेचे जिल्हा चिटणीस गोपाळ लालबेग, नाना कदम, गणेश दगडे, राजेश बोधले, चंद्रकांत पांचाळ, वाशिवले व इतर शिवसैनिकांनी भाग घेतला होता.