महाबळेश्वर : आंबेनळी घाटात 28 जुलै 2018 रोजी दापोली कृषी विद्यापीठाच्या बसचा अपघात झाला आणि विद्यापीठाचे 30 कर्मचारी मृत पावले होते या घटनेला सहा महिने कालावधी होत आला आहे .यावेळी या अपघाताबाबत अनेक संशय व्यक्त केले जात होते. या अपघातानंतर पाच महिने उलटून गेले तरीदेखील पोलीस यंत्रणेला तपास काहीही हाती लागलेले नाही.चार दिवसापूर्वी या अपघाताबाबत मृत बस चालक प्रशांत भांबिडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे सर्व मृतांचे नातेवाईक व दापोलीकर प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यामुळे दापोली कृषी विद्यापीठाच्या आंबेनळी घाटातील अपघाताच्या संदर्भात मृतांचे नातेवाईक व दापोलिकर व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांसह अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई वर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलादपूर येथे आज पोलीस चौकीत दाखल झाले होते
आंबेनळी घाटातील अपघात हा नियोजनबद्ध कट असावा अश्या भावना यावेळी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या तसेच आंबेनळी अपघातात बचवलेला प्रकाश सावंत देसाई हाच या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप यावेळी दापोलिकारांकडून व नातेवाईकां कडून करण्यात आला.त्याचबरोबर या अपघातात पाच महिने उलटून देखील प्रकाश सावंत देसाई याला अटक करून त्याबाबतीत कारवाई करण्यात शासनाला यश आले नाही असा तीव्र संताव नातेवाईकांनी व्यक्त केला. तसेच सावंत देसाई यानीच हा अपघात जाणीवपूर्वक घडवला असा त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक करावी तसेच त्याची नार्को टेस्ट घेतली जावी. त्यामुळे अपघाता मागचे खरे सत्याचा शोध घ्यावा व मृत ड्राइव्ह प्रशांत भांबिडे हा निर्दोष असल्याची सर्वाना खात्री असल्याने त्याच्यावर नोंदणी केलेला गुन्हा मागे घ्यावा असे संतप्त निवेदन दापोलिकारांनी डी.वाय.एस.पी अरविंद पाटील व पी.आय प्रकाश पवार यांना सादर केले. तसेच या साठी26 जानेवारी पर्यंत कारवाई करावी अन्यथा दापोली कर संताप मोर्चा काढतील तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्या समोर जाऊन न्याय मिळे पर्यंत ठिय्या ठोकू आशा संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी दापोलीचे विद्यमान आमदार संजय कदम , माजी आमदार सूर्यकांत दळवी , मनसेचे कोकण विभागीय नेते व खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, केदार सार्डा, श्रीराम विध्वरे , रमेश पांगत, किशोर देसाई, ॠषी गुजर , पत्रकार चंद्रशेखर जोशी व पत्रकार जितेंद्र गावडे यांचा सह सर्व पक्षीय नेते व मृतांचे कुटुंबिय व शेकडो दापोलीकर हे यावेळी आपल्या संतप्त भावना मांडण्यासाठी उपस्थित राहीले होते. दापोलीकरांचा रूद्र अवतार पहाता आता जर ठोस कारवाई न झाल्यास प्रशासनाला भावी काळात मोठ्या उद्रेकाला समोर जावे लागण्याची शक्यतेची चर्चा सर्वत्र आहे.
आंबेनळी घाट अपघात प्रकरणी सावंत-देसाई याच्यावर गुन्हा दाखल करून नार्को टेस्ट घ्यावी
RELATED ARTICLES